शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

धान केंद्रावरील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST

भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर होणाऱ्या गैरप्रकाराचा लेखाजोखा मांडण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी मंत्री पियुष गोयल ...

भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर होणाऱ्या गैरप्रकाराचा लेखाजोखा मांडण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी मंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी खासदारांनी त्यांना निवेदन दिले.

भंडारा व गोंदिया जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या दोन्ही जिल्ह्यातील ७० टक्के शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला धान केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यशासन खरेदी करतो. मात्र महाराष्ट्र शासनाची उदासीनता शेतकऱ्यांना अडचणीत आणत असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी निवेदनात म्हटले आहे. राज्य शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्यास एक महिना उशीर केला. व्यापारी यांना फायदा व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा संशय या पत्रात खासदारांनी व्यक्त केला आहे. सोबतच २०-२० किलोमीटरचे अंतर कापून शेतकऱ्यांना केंद्रावर धान विकण्यास भाग पाडले जात आहे.

धान खरेदी केंद्र आहे व्यापाऱ्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न काही गोष्टी पाहता उपस्थित होतो. नियमानुसार इतर राज्यातून धान्य आयात करून तो केंद्रांवर विकणे बेकायदेशीर आहे. परंतु हा प्रकार सध्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यात सुरू आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातून ११०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी केलेला धान खरेदी केंद्रावर व्यापारी जास्त दराने विकून नफा कमवित आहेत. शेतकऱ्यांचे धान साठवण्यासाठी असलेली गोदामे व्यापाऱ्यांचा खरेदी केलेल्या धान ठेवण्यासाठी वापरली जात आहे. केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याचे काम सुरू असून यात राज्य सरकारचे अधिकारी व्यापाऱ्याच्या सोबत असल्याचा आरोप खासदार मेंढे यांनी या पत्रात केला आहे. मोहाडी तालुक्यात पर राज्यातून आयात केलेला ५४२ कट्टे धान जप्त करण्यात आला. परंतु अजूनही त्या दोषींवर कारवाई न करण्यात आल्याचे खासदारांनी यावेळी मंत्र्यांना सांगितले.

प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. आलेल्या धान्याच्या नोंदी ठेवतानाही घोळ घातला जात आहे. दोन्ही जिल्ह्यात धान खरेदी केंद्रावर सर्रास होणारा गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रस्तरावर चौकशी समिती गठीत करून दोषींवर कारवाई करावी व शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी या पत्रातून आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे खासदार मेंढे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.