शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
2
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
7
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
8
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
9
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
10
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
11
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
12
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
13
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
14
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
15
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
16
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
17
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
18
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
19
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
20
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

धान केंद्रावरील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST

भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर होणाऱ्या गैरप्रकाराचा लेखाजोखा मांडण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी मंत्री पियुष गोयल ...

भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर होणाऱ्या गैरप्रकाराचा लेखाजोखा मांडण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी मंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी खासदारांनी त्यांना निवेदन दिले.

भंडारा व गोंदिया जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या दोन्ही जिल्ह्यातील ७० टक्के शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला धान केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यशासन खरेदी करतो. मात्र महाराष्ट्र शासनाची उदासीनता शेतकऱ्यांना अडचणीत आणत असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी निवेदनात म्हटले आहे. राज्य शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्यास एक महिना उशीर केला. व्यापारी यांना फायदा व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा संशय या पत्रात खासदारांनी व्यक्त केला आहे. सोबतच २०-२० किलोमीटरचे अंतर कापून शेतकऱ्यांना केंद्रावर धान विकण्यास भाग पाडले जात आहे.

धान खरेदी केंद्र आहे व्यापाऱ्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न काही गोष्टी पाहता उपस्थित होतो. नियमानुसार इतर राज्यातून धान्य आयात करून तो केंद्रांवर विकणे बेकायदेशीर आहे. परंतु हा प्रकार सध्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यात सुरू आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातून ११०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी केलेला धान खरेदी केंद्रावर व्यापारी जास्त दराने विकून नफा कमवित आहेत. शेतकऱ्यांचे धान साठवण्यासाठी असलेली गोदामे व्यापाऱ्यांचा खरेदी केलेल्या धान ठेवण्यासाठी वापरली जात आहे. केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याचे काम सुरू असून यात राज्य सरकारचे अधिकारी व्यापाऱ्याच्या सोबत असल्याचा आरोप खासदार मेंढे यांनी या पत्रात केला आहे. मोहाडी तालुक्यात पर राज्यातून आयात केलेला ५४२ कट्टे धान जप्त करण्यात आला. परंतु अजूनही त्या दोषींवर कारवाई न करण्यात आल्याचे खासदारांनी यावेळी मंत्र्यांना सांगितले.

प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. आलेल्या धान्याच्या नोंदी ठेवतानाही घोळ घातला जात आहे. दोन्ही जिल्ह्यात धान खरेदी केंद्रावर सर्रास होणारा गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रस्तरावर चौकशी समिती गठीत करून दोषींवर कारवाई करावी व शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी या पत्रातून आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे खासदार मेंढे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.