शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

इटियाडोह सिंचन क्षेत्रातील रोवणी लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

लाखांदूर : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली आदी तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसिंचन सुविधा उपलब्ध करणाऱ्या इटियाडोह धरणात सध्या ...

लाखांदूर : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली आदी तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसिंचन सुविधा उपलब्ध करणाऱ्या इटियाडोह धरणात सध्या केवळ २०.४० टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. सदर जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा १३ टक्क्यांनी कमी असल्याने यंदाच्या खरिपातील इटियाडोह सिंचन क्षेत्रातील धान रोवणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

माहितीनुसार, पूर्व विदर्भातील इटियाडोह धरण अंतर्गत भंडारा, गोंदिया व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील लाखांदूर, अर्जुनी,वडसा व आरमोरी आदी चार तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध केली जात आहे. बाघ इटियाडोह विभागांतर्गत कालव्यांद्वारे शेतकऱ्यांना सदर सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी या विभागांतर्गत एकूण ५५ पाणी वापर संस्था कार्यरत आहेत. या संस्थांतर्गत लाभक्षेत्रातील चारही तालुक्यातील जवळ पास १०८ गावातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ दिला जात आहे. यंदा खरीप हंगामात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने अद्याप या धरणातील जलसाठ्यात वाढ झाली नसल्याची माहिती आहे. गतवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला या धरणात ३१.२५ टक्के इतका जलसाठा उपलब्ध झाला होता. यंदा मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला केवळ २०.४० टक्के जलसाठा असून सरासरी साठ्यापेक्षा खूप कमी असल्याने या लाभ क्षेत्रातील धान पीक रोवणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या धरणांतर्गत भंडारा, गोंदिया व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील एकूण १७ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध होत असतांना केवळ धरणातील पर्याप्त जलसाठ्याअभावी यंदा रोवणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लाखांदूर तालुक्यात या धरणांतर्गत केवळ ४ हजार ७६६ हेक्टर क्षेत्र सिंचित केले जात असून तालुक्यातील उर्वरित क्षेत्रात शेतकरी कृषी वीज पंपाद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध करीत असल्याने तालुक्यातील काही भागात यंदाच्या खरिपातील धान रोवणीला प्रारंभ करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

अद्याप कालव्यांना पाणी नाही

यंदाच्या खरिपात आतापर्यंत कमी स्वरूपात पाऊस झाल्याने इटियाडोह धरणात केवळ २०.४० टक्केच जलसाठा झाला आहे. या धरणांतर्गत सिंचनासाठी कालव्यांना पाणी सोडण्याकरिता ३३ टक्के जलसाठा असणे आवश्यक आहे. या धरणात यंदाच्या पावसाळ्यात कमी स्वरूपात झालेल्या पावसाने ३० टक्के जलसाठा न झाल्याने अद्याप कालव्यांना पाणी न सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कालव्यांना पाणी सोडण्यात आल्यास लाखांदूर तालुक्यातील २२ गावांना खरिपात सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.