शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इटियाडोह सिंचन क्षेत्रातील रोवणी लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

लाखांदूर : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली आदी तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसिंचन सुविधा उपलब्ध करणाऱ्या इटियाडोह धरणात सध्या ...

लाखांदूर : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली आदी तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसिंचन सुविधा उपलब्ध करणाऱ्या इटियाडोह धरणात सध्या केवळ २०.४० टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. सदर जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा १३ टक्क्यांनी कमी असल्याने यंदाच्या खरिपातील इटियाडोह सिंचन क्षेत्रातील धान रोवणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

माहितीनुसार, पूर्व विदर्भातील इटियाडोह धरण अंतर्गत भंडारा, गोंदिया व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील लाखांदूर, अर्जुनी,वडसा व आरमोरी आदी चार तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध केली जात आहे. बाघ इटियाडोह विभागांतर्गत कालव्यांद्वारे शेतकऱ्यांना सदर सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी या विभागांतर्गत एकूण ५५ पाणी वापर संस्था कार्यरत आहेत. या संस्थांतर्गत लाभक्षेत्रातील चारही तालुक्यातील जवळ पास १०८ गावातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ दिला जात आहे. यंदा खरीप हंगामात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने अद्याप या धरणातील जलसाठ्यात वाढ झाली नसल्याची माहिती आहे. गतवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला या धरणात ३१.२५ टक्के इतका जलसाठा उपलब्ध झाला होता. यंदा मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला केवळ २०.४० टक्के जलसाठा असून सरासरी साठ्यापेक्षा खूप कमी असल्याने या लाभ क्षेत्रातील धान पीक रोवणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या धरणांतर्गत भंडारा, गोंदिया व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील एकूण १७ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध होत असतांना केवळ धरणातील पर्याप्त जलसाठ्याअभावी यंदा रोवणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लाखांदूर तालुक्यात या धरणांतर्गत केवळ ४ हजार ७६६ हेक्टर क्षेत्र सिंचित केले जात असून तालुक्यातील उर्वरित क्षेत्रात शेतकरी कृषी वीज पंपाद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध करीत असल्याने तालुक्यातील काही भागात यंदाच्या खरिपातील धान रोवणीला प्रारंभ करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

अद्याप कालव्यांना पाणी नाही

यंदाच्या खरिपात आतापर्यंत कमी स्वरूपात पाऊस झाल्याने इटियाडोह धरणात केवळ २०.४० टक्केच जलसाठा झाला आहे. या धरणांतर्गत सिंचनासाठी कालव्यांना पाणी सोडण्याकरिता ३३ टक्के जलसाठा असणे आवश्यक आहे. या धरणात यंदाच्या पावसाळ्यात कमी स्वरूपात झालेल्या पावसाने ३० टक्के जलसाठा न झाल्याने अद्याप कालव्यांना पाणी न सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कालव्यांना पाणी सोडण्यात आल्यास लाखांदूर तालुक्यातील २२ गावांना खरिपात सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.