शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

समता सप्ताहानिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:33 IST

निंबा : राज्य शासन व स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था समतादूत प्रकल्पाद्वारे डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर ...

निंबा : राज्य शासन व स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था समतादूत प्रकल्पाद्वारे डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ‘डॉ. आंबेडकर यांचे कृषी सिंचन विषयक धोरण’ यावर ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रम सोमवारी (दि. १२) घेण्यात आला.

मुख्य मार्गदर्शक म्हणून पवन पाथोडे, तर अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून साजन वासनिक, महेंद्र कटबरीये, करुणा मेश्राम, शारदा कळसकर, संदेश उके, राजरत्न मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी पाथोडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नसून, एक विचार व एक चळवळ आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.

आंबेडकरांनी शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनेक चळवळी केल्या, विधिमंडळावर मोर्चे नेले व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी दामोदर नदी प्राधिकरण स्थापन केले, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन समतादूत मुनेश रहांगडाले व मनिष बिजेवार यांनी केले होते.

समता सप्ताहाचे आयोजन बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये व सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.