शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन

By admin | Updated: November 4, 2016 00:53 IST

अनेक वर्षापासून अड्याळ येथील वॉर्ड क्र. ३ मधील बंडू खोब्रागडे यांनी राहत्या घरी भंगार व्यवसाय सुरु केला होता.

लोकमत वृत्ताची दखल :अड्याळ येथील वॉर्ड क्रमांक तीनचे प्रकरण विशाल रणदिवे  अड्याळअनेक वर्षापासून अड्याळ येथील वॉर्ड क्र. ३ मधील बंडू खोब्रागडे यांनी राहत्या घरी भंगार व्यवसाय सुरु केला होता. एवढा वाढला की, त्या ठेवलेल्या भंगार वस्तुमुळे तिथून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना त्याचा त्रास होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून अन्यायाला वाचा फोडली होती. याची दखल घेत पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले.त्यातच तिथे राहणाऱ्या ग्रामस्थांना सुध्दा त्याचा त्रास रोजच होत होता. ह्या समस्येविषयी भंगार व्यवसायीकाला ग्रामस्थांनी शेजाऱ्यांनी अनेकदा विंनती केली असतानाही व्यवसाय चालकांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. नंतरचा एक उपाय म्हणून वॉर्डातील काही ग्रामस्थांनी याविषयीची लेखी तक्रार ग्रामपंचायतला दिली. सर्वानुमते रस्त्यावरील घराजवळील ठेवलेला भंगार सामान लवकर उचलण्याचे आदेश ग्रामपंचायतीने या आधी व्यवसायीकाला अनेकदा दिले असतनाही भंगार सामान रस्त्यावरच बळजबरीने ठेवल्यासारखाच होता यात काही शंका नाही. पंरतु जेव्हा ग्रामपंचायत आपल्या नियमावर आली तर आपला भंगार सामान कधीही उचलू शकते याची कल्पना सुध्दा त्या भंगार व्यवसायीकाला कदाचीत नसावी असेच वाटते. ग्रामपंचायत एवढी कठोर नियमावर बोट ठेवून हा भंगार सामान हटविणार म्हणून ग्रामस्थांनाही विश्वास वाटत नव्हता. हा भंगार सामान हटविण्यासाठी ग्रामपंचायतीने एक बुलडोजर, २ ट्रक्टर व पाचसहा पोलिस कर्मचारी व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी, व्यवासायीक घरी नसतांना सुध्दा तेथील अतिक्रमण शांततेत काढण्यात आले.या आधी दोन तीनदा चारदा याविषयी पत्रव्यवहार केला परंतू त्याचा काहीही परिणाम व्यावसायीकावर झाला नाही. अतिक्रमण काढण्याआधी रस्ता पाच सहा फुट होता. काढल्यानंरत ११ ते १२ फुट झाला रस्ता मोकळा झाला ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे आभार मानले.ग्रामपंचायतीने जप्त केलेला भंगार सामान ३ नोव्हेंबर रोजी पर्यंत जर व्यवसायीकाने १४,५०० रुपये भरले नाही तर विक्री होणार होता. आता पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही की होणार हाही एक प्रश्नच आहे. परंतु व्यवसाय चालक हजर नसताना हा अतिक्रमण काढला तो कायदेशीर आहे की गैरकायदेशीर आहे याचीही चर्चा सध्या गावात रंगत आहे. जर का गैरकायदेशीर असेल तर ग्रामपंचायत काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.