शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

एका संघर्षाची अखेर...

By admin | Updated: January 21, 2017 00:27 IST

देशात खळबळ उडवून देणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील कर्ता पुरूष भय्यालाल भोतमांगे यांचे शुक्रवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नागपूर येथील रूग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

भंडारा : देशात खळबळ उडवून देणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील कर्ता पुरूष भय्यालाल भोतमांगे यांचे शुक्रवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नागपूर येथील रूग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव आज शनिवारला भंडारा येथे आणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी समाजात शोककळा पसरली आहे. मोहाडी तालुक्यातील खैरलांजी या छोट्याशा गावात भय्यालाल भोतमांगे त्यांची पत्नी सुरेखा, मुलगा रोशन व सुधीर आणि मुलगी प्रियंका असा पाच जणांचा परिवार होता. २९ सप्टेंबर २००६ च्या रात्री खैरलांजी येथील त्यांच्या घरावर गावातील काही लोकांनी हल्ला करून भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (३८), सुधीर (२२), रोशन (१८), प्रियंका (१८) यांची हत्या केली होती. या घटनेतून भय्यालाल हे एकमेव बचावले होते. या हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.याप्रकरणाचा खटला भंडारा जलदगती न्यायालयात सुरू होता. जलदगती न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी २४ सप्टेंबर २००८ रोजी या प्रकरणातील सहा आरोपींना फाशीची शिक्षा तर दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (नगर प्रतिनिधी)भंडारा जलदगती न्यायालयाने या प्रकरणातील आठ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला आव्हान देण्यात आले. नागपूर खंडपीठाने यातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे न्याय न मिळताच भोतमांगे यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. - अमृत बन्सोड, आंबेडकरी विचारवंतभय्यालाल भोतमांगे हे मनमिळावू स्वभावाचे होते. खैरलांजी हत्याकांडानंतर ते एकाकी पडल्याने ते नेहमी चिंतेत राहायचे. दलित, शोषित समाज त्यांच्या पाठिशी होता. न्यायासाठी त्यांची धडपड सुरु होती. मात्र न्याय मिळण्यापुर्वीच त्यांचे निधन झाल्याने समाजबांधवांना हादरा बसला आहे. - डी.एफ. कोचे, राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल.माणुसकीला काळीमा फासणाऱ्या खैरलांजी घटनेनंतर देशातील समाजबांधव भय्यालाल यांच्या पाठिशी होता. २००६ पासून न्याय मिळविण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू होता. भय्यालाल यांच्या निधनामुळे समाज पोरका झाला असून दलित समाजाला न्याय देण्यासाठी लढा देत राहू.- आसित बागडे, कार्याध्यक्ष रिपाई (आ) भंडारा.