पालांदूर : ग्रामपंचायतच्या पुढाकाराने पालांदूर बसस्थानकाजवळील वादग्रस्त अतिक्रमण हटवून व्यापारी गाळ्यांचा पायाभरणी सुरू करण्यात आली आहे. या कारवाईनंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे गावभर कौतुक केले जात आहे. यापुढे बाजार चौकातील साई मंदिराच्या समोरील अतिक्रमण हटविण्याची मागणी जनतेनी केली आहे.अतिक्रमण गावविकासात मोठी अडचण ठरते. नेमकी माणसं स्वखर्चाने बोकाळल्याने अख्या गावाचे नुकसान करून ठेवतात. अशापैकी स्थानिक लोकप्रतिनिधी निसंकोजपणे काम करून गावाला विकासाभिमुख चेहरा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. असाच प्रामाणिक प्रयत्न पालांदूर ग्रामपंचायतीने करून बसस्थानकाला अर्थात बाजार चौकाला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे.बाजारचौकात कापड ओळ समोरील खुल्या जागेत बरेच जुने वादग्रस्त अतिक्रमण होते. या जागेत पावसाळ्यात गुरे ढोरे, तणस, शेणखत आदीमुळे घाण वास, डासांचे माहेरघर, घातक किटक निवारा करीत होते. यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांना पादचाऱ्यांना व शेजाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे. अनेकदा तक्रारी करूनही फायदा झाला नाही. मागील ग्रामपंचायतच्या कमेटीने प्रयत्न केले. पण तेही नापास झाले. तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही तक्रार करून अतिक्रमण हटलेच नाही. मात्र यावेळी ग्रामपंचायतने कंबर कसत नजरेच्या समोर अतिक्रमणाची जागा मोकळी करून त्वरीत जेसीपीच्या साहायाने खोदकाम करून पायाभरणीस आरंभ केला.सुवर्णग्रामजयंती योजने अंतर्गत तीन व्यापारी गाळे बांधण्यास सुरूवात झाली. यावेळी नायब तहसीलदार शिंदे लाखनी, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यगण, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीस कर्मचारी व पालांदुरवासीयांची उपस्थिती होती.अतिक्रमण कारवाईनंतर गावात चर्चेला उधाण आले आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने अतिक्रमण हटले
By admin | Updated: June 22, 2014 23:53 IST