शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने अतिक्रमण हटले

By admin | Updated: June 22, 2014 23:53 IST

ग्रामपंचायतच्या पुढाकाराने पालांदूर बसस्थानकाजवळील वादग्रस्त अतिक्रमण हटवून व्यापारी गाळ्यांचा पायाभरणी सुरू करण्यात आली आहे. या कारवाईनंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे गावभर कौतुक केले जात आहे.

पालांदूर : ग्रामपंचायतच्या पुढाकाराने पालांदूर बसस्थानकाजवळील वादग्रस्त अतिक्रमण हटवून व्यापारी गाळ्यांचा पायाभरणी सुरू करण्यात आली आहे. या कारवाईनंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे गावभर कौतुक केले जात आहे. यापुढे बाजार चौकातील साई मंदिराच्या समोरील अतिक्रमण हटविण्याची मागणी जनतेनी केली आहे.अतिक्रमण गावविकासात मोठी अडचण ठरते. नेमकी माणसं स्वखर्चाने बोकाळल्याने अख्या गावाचे नुकसान करून ठेवतात. अशापैकी स्थानिक लोकप्रतिनिधी निसंकोजपणे काम करून गावाला विकासाभिमुख चेहरा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. असाच प्रामाणिक प्रयत्न पालांदूर ग्रामपंचायतीने करून बसस्थानकाला अर्थात बाजार चौकाला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे.बाजारचौकात कापड ओळ समोरील खुल्या जागेत बरेच जुने वादग्रस्त अतिक्रमण होते. या जागेत पावसाळ्यात गुरे ढोरे, तणस, शेणखत आदीमुळे घाण वास, डासांचे माहेरघर, घातक किटक निवारा करीत होते. यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांना पादचाऱ्यांना व शेजाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे. अनेकदा तक्रारी करूनही फायदा झाला नाही. मागील ग्रामपंचायतच्या कमेटीने प्रयत्न केले. पण तेही नापास झाले. तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही तक्रार करून अतिक्रमण हटलेच नाही. मात्र यावेळी ग्रामपंचायतने कंबर कसत नजरेच्या समोर अतिक्रमणाची जागा मोकळी करून त्वरीत जेसीपीच्या साहायाने खोदकाम करून पायाभरणीस आरंभ केला.सुवर्णग्रामजयंती योजने अंतर्गत तीन व्यापारी गाळे बांधण्यास सुरूवात झाली. यावेळी नायब तहसीलदार शिंदे लाखनी, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यगण, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीस कर्मचारी व पालांदुरवासीयांची उपस्थिती होती.अतिक्रमण कारवाईनंतर गावात चर्चेला उधाण आले आहे. (वार्ताहर)