शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

कॅटरर्स ठरताहेत युवकांसाठी रोजगार

By admin | Updated: April 5, 2015 00:50 IST

सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. या कार्यक्र मात अन्नाचे वाढणं करण्याचे आॅर्डर दिल्या जात असतात. ..

पोटासाठी : शाळकरी मुलांचाही सहभागभंडारा : सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. या कार्यक्र मात अन्नाचे वाढणं करण्याचे आॅर्डर दिल्या जात असतात. असे वाढणं करण्यासाठी युवक मंडळींची आवश्यकता असते. त्यामुळे कॅटरर्सच्या माध्यमातून अशाप्रकारे वाढणं करीत असलेल्या युवकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. दहावी बारावीची परीक्षा आटोपली आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामीण भागातील युवक या व्यवसायात सामील झाले आहे. गावागावात बुफे व पंगत वाढण्याचे आॅर्डर घेतल्या जाईल, असे फलक लागले आहे. उन्हाळ््यात काय करावे असा प्रश्न अनेक युवकांना पडतो. त्यामुळे कष्टाची सवय असलेल्या व कामाची लाज नसलेल्या युवकांसाठी हा व्यवसाय रोजगाराचे नवे साधन ठरत आहे. या युवकांचा प्रमुख किंवा कॅटर्स उद्योजक असे आॅर्डर घेतात. यात १० ते १५ मुलांची गरज असते. प्रत्येकाला १२० ते १५० रूपये रोज दिले जाते. तसेच एखाद्याला कार्यक्रमात पंगत वाढायची असते. अशावेळी जास्त पैसे आकारले जातात. घरी राहून वेळ व्यर्थ घालण्यापेक्षा काही तरी काम करून मोबादला मिळतो याचा आनंद असल्याचे मत युवक व्यक्त करीत असतात. यातील काही युवक स्वत: आॅर्डर घेऊन शहरातही वाढणं करण्यासाठी जात असतात. ग्रामीण भागातील १० वी १२ वीत शिक्षण घेणारे विद्यार्थी यात मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात काही लहान मुलेही असतात. परंतु मोठी मुले त्यांच्यावर कामाचा ताण न पडू देता त्यांना सांभाळून घेत असल्याचा अनुभव येत असल्याचे कार्यक्रमांमध्ये गेलेले नागरिक सांगतात. यातून उन्हाळ््यातील दिवसात स्वयंरोजगार होत असून आर्थिक स्थिती हलाखीची असलेल्या कुटुंबीयांना यातून आधार मिळत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून सद्यस्थितीत शेतीमालाला भाव मिळत नसून नैसिर्गक आपत्तीने शेती करणे कठीण झाले आहे. या व्यवसायातून ग्रामीण युवकांच्या हाताला काम मिळत असून काही प्रमाणात होत असलेल्या मिळकतीमुळे कुटुंबातून या कामाकरिता परवानगी दिली जात असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)कामे करण्यास मित्रमंडळी अनुत्सूकआधी मित्राच्या घरी लग्न किंवा इतरही कार्यक्र म असल्यास इतर मित्र सर्व कामे करीत असे. परंतु आजघडीला मात्र असे चित्र दिसत नाही. त्यामुळे एक नवा रोजगार उदयास आला आहे. अनेक जण स्वयंपाक स्वत: करून केवळ वाढण्याचे आॅर्डर देतात. त्यामुळे थोडा फायदा होतो व युवकांना रोजगारही मिळतो. फुकटात पंगत वाढण्याचे दिवस संपलेकाही वर्षांपूर्वी गावात कोणताही कार्यक्रम असल्यास मित्र परिवार व नातेवाईक आपुलकीने सहभागी होऊन हातभार लावत असे. तसेच वाढण्याचे कामही करीत असे. पण बदलत्या काळानुसार व कुणालाही वेळ देता येत नसल्याने अलीकडे पूर्ण व हाफ कॅटर्सचा काळ आला आहे. यामुळे कोणतेही काम नातेवाईकांना करावे लागत नाही. पैसा देऊन सर्व कामे उरकविण्याकडे कल वाढला आहे.