शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कॅटरर्स ठरताहेत युवकांसाठी रोजगार

By admin | Updated: April 5, 2015 00:50 IST

सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. या कार्यक्र मात अन्नाचे वाढणं करण्याचे आॅर्डर दिल्या जात असतात. ..

पोटासाठी : शाळकरी मुलांचाही सहभागभंडारा : सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. या कार्यक्र मात अन्नाचे वाढणं करण्याचे आॅर्डर दिल्या जात असतात. असे वाढणं करण्यासाठी युवक मंडळींची आवश्यकता असते. त्यामुळे कॅटरर्सच्या माध्यमातून अशाप्रकारे वाढणं करीत असलेल्या युवकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. दहावी बारावीची परीक्षा आटोपली आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामीण भागातील युवक या व्यवसायात सामील झाले आहे. गावागावात बुफे व पंगत वाढण्याचे आॅर्डर घेतल्या जाईल, असे फलक लागले आहे. उन्हाळ््यात काय करावे असा प्रश्न अनेक युवकांना पडतो. त्यामुळे कष्टाची सवय असलेल्या व कामाची लाज नसलेल्या युवकांसाठी हा व्यवसाय रोजगाराचे नवे साधन ठरत आहे. या युवकांचा प्रमुख किंवा कॅटर्स उद्योजक असे आॅर्डर घेतात. यात १० ते १५ मुलांची गरज असते. प्रत्येकाला १२० ते १५० रूपये रोज दिले जाते. तसेच एखाद्याला कार्यक्रमात पंगत वाढायची असते. अशावेळी जास्त पैसे आकारले जातात. घरी राहून वेळ व्यर्थ घालण्यापेक्षा काही तरी काम करून मोबादला मिळतो याचा आनंद असल्याचे मत युवक व्यक्त करीत असतात. यातील काही युवक स्वत: आॅर्डर घेऊन शहरातही वाढणं करण्यासाठी जात असतात. ग्रामीण भागातील १० वी १२ वीत शिक्षण घेणारे विद्यार्थी यात मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात काही लहान मुलेही असतात. परंतु मोठी मुले त्यांच्यावर कामाचा ताण न पडू देता त्यांना सांभाळून घेत असल्याचा अनुभव येत असल्याचे कार्यक्रमांमध्ये गेलेले नागरिक सांगतात. यातून उन्हाळ््यातील दिवसात स्वयंरोजगार होत असून आर्थिक स्थिती हलाखीची असलेल्या कुटुंबीयांना यातून आधार मिळत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून सद्यस्थितीत शेतीमालाला भाव मिळत नसून नैसिर्गक आपत्तीने शेती करणे कठीण झाले आहे. या व्यवसायातून ग्रामीण युवकांच्या हाताला काम मिळत असून काही प्रमाणात होत असलेल्या मिळकतीमुळे कुटुंबातून या कामाकरिता परवानगी दिली जात असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)कामे करण्यास मित्रमंडळी अनुत्सूकआधी मित्राच्या घरी लग्न किंवा इतरही कार्यक्र म असल्यास इतर मित्र सर्व कामे करीत असे. परंतु आजघडीला मात्र असे चित्र दिसत नाही. त्यामुळे एक नवा रोजगार उदयास आला आहे. अनेक जण स्वयंपाक स्वत: करून केवळ वाढण्याचे आॅर्डर देतात. त्यामुळे थोडा फायदा होतो व युवकांना रोजगारही मिळतो. फुकटात पंगत वाढण्याचे दिवस संपलेकाही वर्षांपूर्वी गावात कोणताही कार्यक्रम असल्यास मित्र परिवार व नातेवाईक आपुलकीने सहभागी होऊन हातभार लावत असे. तसेच वाढण्याचे कामही करीत असे. पण बदलत्या काळानुसार व कुणालाही वेळ देता येत नसल्याने अलीकडे पूर्ण व हाफ कॅटर्सचा काळ आला आहे. यामुळे कोणतेही काम नातेवाईकांना करावे लागत नाही. पैसा देऊन सर्व कामे उरकविण्याकडे कल वाढला आहे.