शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा तिढा सुटेना

By admin | Updated: September 5, 2015 00:38 IST

१ सप्टेंबरपासून वरठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. शुक्रवारला दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी व खंड विकास अधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा केली.

दोघांची प्रकृती खालावली : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली चर्चा वरठी : १ सप्टेंबरपासून वरठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. शुक्रवारला दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी व खंड विकास अधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा केली. या भेटीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा आढावा घेऊन मागण्या पूर्ण होणे शक्य नसल्याचे सांगितले. परंतु उपोषणकर्ते व संघटनांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तुर्तास तरी उपोषण सुटण्याची शक्यता मावळली आहे.वरठी ग्रामपंचायतमध्ये ३७ कर्मचारी कार्यरत आहेत. यात २३ कर्मचारी स्थायी आहेत. शासनाच्या आकृतीबंधानुसार एकूण उत्पन्नाच्या ३५ टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारावर खर्च करता येते. त्यानुसार या ग्रामपंचायतीत आकृतीबंधानुसार ६ कर्मचारी नियुक्त करण्याचा नियम आहे. परंतु वेळोवेळी बदललेल्या सरपंचांनी सोयीनुसार २३ कर्मचाऱ्यांना स्थायी केले. सद्यस्थितीत चार कर्मचाऱ्यांना आकृतीबंधानुसार किमान वेतन व राहणीमान भत्ता देण्यात येत आहे. उर्वरित दोन कर्मचाऱ्यांचे प्रस्तावर सुधारित वेतनश्रेणीकरिता प्रस्तावित आहे. त्यानुसार उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता देण्यात यावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी १९ आॅगस्टपासून साखळी उपोषण सुरु केले होते. १२ दिवस साखळी उपोषण करुनही मागणी पूर्ण न झाल्यामुळे १ सप्टेंबरपासून १३ कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले. याचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालयात जावून आढावा घेतला. ग्रामपंचायतच्या सर्व स्त्रोतातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ७० टक्केच्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होताना आढळून आले. त्यामुळे ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. यावेळी खंडविकास अधिकारी पंकज भोयर, सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलिंद रामटेके, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, मिलिंद धारगावे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बोरकर, शाखोद डाकरे, सुनिता बोंदरे, संगिता सुखानी, ग्राम विकास अधिकारी भाष्कर डोमळे व उपोषणकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)उपोषणकर्ते रुग्णालयातग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी १ कर्मचाऱ्याच्या छातीत दुखत होते. परंतु त्यांनी भरती होण्यासाठी नकार दिला. चौथ्या दिवशी मोतीलाल गजभिये, मुन्ना वांद्रे यांना प्राथमिक तपासणीकरीता वरठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले,-तर करात दुपटीने वाढ होणार?ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतला उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागतील. ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न ३४ लाख रुपये आहे. हे उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण होणे शक्य नाही. यासाठी गृहकर, पाणी पट्टीकर, दिवाबत्ती कर यासह सर्वच कर आणि ग्रामपंचायतला उत्पन्न देणारे सर्व स्त्रोतातील आवक दुप्पट करावी लागेल. तेव्हाच या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.