शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा तिढा सुटेना

By admin | Updated: September 5, 2015 00:38 IST

१ सप्टेंबरपासून वरठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. शुक्रवारला दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी व खंड विकास अधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा केली.

दोघांची प्रकृती खालावली : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली चर्चा वरठी : १ सप्टेंबरपासून वरठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु आहे. शुक्रवारला दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी व खंड विकास अधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा केली. या भेटीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा आढावा घेऊन मागण्या पूर्ण होणे शक्य नसल्याचे सांगितले. परंतु उपोषणकर्ते व संघटनांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तुर्तास तरी उपोषण सुटण्याची शक्यता मावळली आहे.वरठी ग्रामपंचायतमध्ये ३७ कर्मचारी कार्यरत आहेत. यात २३ कर्मचारी स्थायी आहेत. शासनाच्या आकृतीबंधानुसार एकूण उत्पन्नाच्या ३५ टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारावर खर्च करता येते. त्यानुसार या ग्रामपंचायतीत आकृतीबंधानुसार ६ कर्मचारी नियुक्त करण्याचा नियम आहे. परंतु वेळोवेळी बदललेल्या सरपंचांनी सोयीनुसार २३ कर्मचाऱ्यांना स्थायी केले. सद्यस्थितीत चार कर्मचाऱ्यांना आकृतीबंधानुसार किमान वेतन व राहणीमान भत्ता देण्यात येत आहे. उर्वरित दोन कर्मचाऱ्यांचे प्रस्तावर सुधारित वेतनश्रेणीकरिता प्रस्तावित आहे. त्यानुसार उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता देण्यात यावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी १९ आॅगस्टपासून साखळी उपोषण सुरु केले होते. १२ दिवस साखळी उपोषण करुनही मागणी पूर्ण न झाल्यामुळे १ सप्टेंबरपासून १३ कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले. याचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालयात जावून आढावा घेतला. ग्रामपंचायतच्या सर्व स्त्रोतातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ७० टक्केच्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होताना आढळून आले. त्यामुळे ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. यावेळी खंडविकास अधिकारी पंकज भोयर, सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलिंद रामटेके, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, मिलिंद धारगावे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बोरकर, शाखोद डाकरे, सुनिता बोंदरे, संगिता सुखानी, ग्राम विकास अधिकारी भाष्कर डोमळे व उपोषणकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)उपोषणकर्ते रुग्णालयातग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी १ कर्मचाऱ्याच्या छातीत दुखत होते. परंतु त्यांनी भरती होण्यासाठी नकार दिला. चौथ्या दिवशी मोतीलाल गजभिये, मुन्ना वांद्रे यांना प्राथमिक तपासणीकरीता वरठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले,-तर करात दुपटीने वाढ होणार?ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतला उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागतील. ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न ३४ लाख रुपये आहे. हे उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण होणे शक्य नाही. यासाठी गृहकर, पाणी पट्टीकर, दिवाबत्ती कर यासह सर्वच कर आणि ग्रामपंचायतला उत्पन्न देणारे सर्व स्त्रोतातील आवक दुप्पट करावी लागेल. तेव्हाच या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.