शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

तंटामुक्त मोहिमेत महिला सुरक्षेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:34 IST

राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविली जाते. ही मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. गावातील ...

राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविली जाते. ही मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यात येत आहेत. त्यामुळे आता शासनाने ग्रामीण भागातील स्त्री अत्याचाराच्या घटनेचा चढता आलेख पाहता, त्यावर तात्काळ आळा बसण्यासाठी तंटामुक्त गाव मोहिमेचा आधार घेण्याचे निश्चित केले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत महिला सुरक्षा व महिलांसंबंधी असलेल्या प्रकरणात अधिक दक्ष राहण्यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महिलांसंबंधी आलेल्या सर्व प्रकरणात मार्गदर्शन व त्यासंबंधी परिणामकारक अंमलबजावणी होण्यासंबंधी राज्यातील सर्व तंटामुक्त गाव समित्यांना गृह विभागाच्या वतीने सूचित केले आहे. मोहिमेच्या दहा वर्षात गाव समित्यांनी गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे संबंधित गावातील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण घटले असून, न्यायव्यवस्थेवरचा ताणही कमी होण्यास मदत झाली आहे. मागील दहा वर्षांच्या काळात राज्यातील हजारो गावांनी तंटामुक्त होत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे पटकाविली आहेत. त्यातून गाव विकासाला चालना मिळाली आहे.

आता महिलांना तंटामुक्त गाव समितीत ५० टक्के इतका समान वाटा अनिवार्य करण्यात आल्याने, महिलांविषयक समस्या झपाट्याने सुटण्यास मदत होणार आहे. मात्र अद्यापही काही गावांमध्ये महिला सदस्यांना कागदोपत्री सामावून घेत प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे.