शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

तंटामुक्त मोहिमेत महिला सुरक्षेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:34 IST

राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविली जाते. ही मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. गावातील ...

राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविली जाते. ही मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यात येत आहेत. त्यामुळे आता शासनाने ग्रामीण भागातील स्त्री अत्याचाराच्या घटनेचा चढता आलेख पाहता, त्यावर तात्काळ आळा बसण्यासाठी तंटामुक्त गाव मोहिमेचा आधार घेण्याचे निश्चित केले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत महिला सुरक्षा व महिलांसंबंधी असलेल्या प्रकरणात अधिक दक्ष राहण्यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महिलांसंबंधी आलेल्या सर्व प्रकरणात मार्गदर्शन व त्यासंबंधी परिणामकारक अंमलबजावणी होण्यासंबंधी राज्यातील सर्व तंटामुक्त गाव समित्यांना गृह विभागाच्या वतीने सूचित केले आहे. मोहिमेच्या दहा वर्षात गाव समित्यांनी गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे संबंधित गावातील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण घटले असून, न्यायव्यवस्थेवरचा ताणही कमी होण्यास मदत झाली आहे. मागील दहा वर्षांच्या काळात राज्यातील हजारो गावांनी तंटामुक्त होत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे पटकाविली आहेत. त्यातून गाव विकासाला चालना मिळाली आहे.

आता महिलांना तंटामुक्त गाव समितीत ५० टक्के इतका समान वाटा अनिवार्य करण्यात आल्याने, महिलांविषयक समस्या झपाट्याने सुटण्यास मदत होणार आहे. मात्र अद्यापही काही गावांमध्ये महिला सदस्यांना कागदोपत्री सामावून घेत प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे.