शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीत प्रवेश 'नो टेन्शन'

By admin | Updated: June 17, 2015 01:02 IST

यंदा जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८२.७२ टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १८,८२० आणि जिल्ह्यातील कनिष्ठ

प्रशांत देसाई ल्ल भंडारायंदा जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८२.७२ टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १८,८२० आणि जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध जागा १६,१४० आहे. उत्तीर्ण विद्यार्थी व प्रवेश क्षमता बघता यंदा अकरावी प्रवेशाचे 'नो टेन्शन' असेच म्हणावे लागेल. अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित रहावे लागणार नसल्याची चिन्हे आहेत. यंदा जिल्ह्यातील २८७ शाळांमधून २३ हजार ७२० विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी १८ हजार ८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी ७९.४९ तर मुलींची टक्केवारी ८५.९४ इतकी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १४४ कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांच्या जागांची संख्या १६ हजार १४० आहे. १८ हजार ८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्यामुळे जागांच्या उपलब्धतेनुसार २ हजार ६८० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकांनी प्रवेशासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये यासाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्याल तथा वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्नित महाविद्यालयांना त्यांना असलेल्या मान्यतेपेक्षा अतिरीक्त २० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मान्यता आहे. दहावीनंतर पुढे काय? असा प्रश्न असलेल्या विद्यार्थी व पालकांसमोर अनेक अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्ध आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ७५.९६ टक्के लागला होता. यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली आहे. अकरावी प्रवेशासाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या जिल्ह्यात २१५ तुकड्यांना मान्यता आहे. प्रवेश क्षमतेसंबंधात प्रत्येक महाविद्यालयांना २० ची अधिकची मान्यता दिल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे पाल्यांच्या शिक्षणाप्रती पालकांनी 'आॅल इज वेल' म्हणून नि:संकोच रहावे, असे म्हटल्यास वागवे ठरू नये.महाविद्यालय व प्रवेश क्षमताजिल्ह्यात १४४ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यात वरिष्ठ महाविद्यालय ११, माध्यमिक महा. संलग्नित ८७, स्वतंत्र महाविद्यालय १५, जिल्हा परिषद महाविद्यालय २१, नगरपालिका महाविद्यालय ०५ व स्वयंम अर्थसहाहित ०५ महाविद्यालयांचा समावेश आहे. शाखानिहाय क्षमता याप्रमाणे. कला ९,६६०, विज्ञान ५,१६०, वाणिज्य ९८० व संयुक्त महाविद्यालयात ३४० असे १६ हजार १४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे.शहराकडे कलपाल्याला भंडारामध्ये प्रवेश मिळावा. यासाठी बहुतांश पालक आग्रही आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची असली तरी, विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश मिळावा यासाठी वशिलेबाजीही सुरू आहे.प्रवेश गुणवत्तेवरप्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्याने मिळविलेले गुण या आधारेच सर्वच महाविद्यालयांमध्ये प्रवेश यादी तयार केली जाते. परिणामी, गुणवत्ता यादी जाहीर केली काय आणि नाही केली काय प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच आहे.यंदा निकालाची टक्केवारी वाढली. पण, उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेशाची चिंता नाही. अनेक पर्याय, शाखा आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे. पसंतीच्या महाविद्यालयात पाल्याला प्रवेश मिळाला नाही तर इतर ठिकाणी प्रयत्न करा, मात्र निराश होऊ नका.- के. झेड. शेंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) भंडारा