शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

अकरावीत प्रवेश 'नो टेन्शन'

By admin | Updated: June 17, 2015 01:02 IST

यंदा जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८२.७२ टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १८,८२० आणि जिल्ह्यातील कनिष्ठ

प्रशांत देसाई ल्ल भंडारायंदा जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८२.७२ टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १८,८२० आणि जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध जागा १६,१४० आहे. उत्तीर्ण विद्यार्थी व प्रवेश क्षमता बघता यंदा अकरावी प्रवेशाचे 'नो टेन्शन' असेच म्हणावे लागेल. अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित रहावे लागणार नसल्याची चिन्हे आहेत. यंदा जिल्ह्यातील २८७ शाळांमधून २३ हजार ७२० विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी १८ हजार ८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी ७९.४९ तर मुलींची टक्केवारी ८५.९४ इतकी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १४४ कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांच्या जागांची संख्या १६ हजार १४० आहे. १८ हजार ८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्यामुळे जागांच्या उपलब्धतेनुसार २ हजार ६८० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकांनी प्रवेशासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये यासाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्याल तथा वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्नित महाविद्यालयांना त्यांना असलेल्या मान्यतेपेक्षा अतिरीक्त २० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मान्यता आहे. दहावीनंतर पुढे काय? असा प्रश्न असलेल्या विद्यार्थी व पालकांसमोर अनेक अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्ध आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ७५.९६ टक्के लागला होता. यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली आहे. अकरावी प्रवेशासाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या जिल्ह्यात २१५ तुकड्यांना मान्यता आहे. प्रवेश क्षमतेसंबंधात प्रत्येक महाविद्यालयांना २० ची अधिकची मान्यता दिल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे पाल्यांच्या शिक्षणाप्रती पालकांनी 'आॅल इज वेल' म्हणून नि:संकोच रहावे, असे म्हटल्यास वागवे ठरू नये.महाविद्यालय व प्रवेश क्षमताजिल्ह्यात १४४ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यात वरिष्ठ महाविद्यालय ११, माध्यमिक महा. संलग्नित ८७, स्वतंत्र महाविद्यालय १५, जिल्हा परिषद महाविद्यालय २१, नगरपालिका महाविद्यालय ०५ व स्वयंम अर्थसहाहित ०५ महाविद्यालयांचा समावेश आहे. शाखानिहाय क्षमता याप्रमाणे. कला ९,६६०, विज्ञान ५,१६०, वाणिज्य ९८० व संयुक्त महाविद्यालयात ३४० असे १६ हजार १४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे.शहराकडे कलपाल्याला भंडारामध्ये प्रवेश मिळावा. यासाठी बहुतांश पालक आग्रही आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची असली तरी, विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश मिळावा यासाठी वशिलेबाजीही सुरू आहे.प्रवेश गुणवत्तेवरप्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्याने मिळविलेले गुण या आधारेच सर्वच महाविद्यालयांमध्ये प्रवेश यादी तयार केली जाते. परिणामी, गुणवत्ता यादी जाहीर केली काय आणि नाही केली काय प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच आहे.यंदा निकालाची टक्केवारी वाढली. पण, उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेशाची चिंता नाही. अनेक पर्याय, शाखा आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे. पसंतीच्या महाविद्यालयात पाल्याला प्रवेश मिळाला नाही तर इतर ठिकाणी प्रयत्न करा, मात्र निराश होऊ नका.- के. झेड. शेंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) भंडारा