शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

गावातील विद्युत खांब धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:35 IST

अपघाताची शक्यता : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष अडयाळ : येथील ठिकठिकाणचे विद्युत पुरवठा करणारे खांब आता जीर्णावस्थेत आहेत. ...

अपघाताची शक्यता : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष

अडयाळ : येथील ठिकठिकाणचे विद्युत पुरवठा करणारे खांब आता जीर्णावस्थेत आहेत. याकडे दुर्लक्ष म्हणजे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. याकडे तत्काळ लक्ष केंद्रित करून विद्युत विभागाने कारवाई करावी, अशी मागणी अडयाळ ग्रामवासी करताना दिसतात.

अडयाळ गावातील मुख्य चौक असो वा रस्त्याच्या कडेला असलेले विद्युत खांब हा सोसाट्याच्या वाऱ्यात कोसळून तर जाणार नाहीत, अशीही भीती अनेकदा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

वीज वितरण विभागाचे लक्ष जास्तीत जास्त विद्युत ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा करावा यावर आहे. यासोबतच जीर्ण झालेल्या, कधीही कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता असणाऱ्या तसेच एका बाजूला तोल गेलेल्या विद्युत खांबांकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. एखादा अपघात झाल्यास, एखादा जीव गेल्यास याला सर्वस्वी जबाबदार वीज वितरण विभागच राहणार का? असाही संतप्त सवाल व्यक्त होत आहे.

गावात विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे आणि वेळोवेळी तशी कामेसुध्दा केली जातात. पण महत्त्वाचे म्हणजे जे विद्युत पुरवठा करणारी खांब आहेत त्यांची क्षमता आज मात्र ढासळत चालली आहे. आझाद वॉर्डातील बोलके चित्र.

यामुळे या ठिकाणी कधीही धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे गावातील ठिकठिकाणची वास्तव स्थिती आहे. एखादा निष्पाप जीवही जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.