शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पायाभूत संकलित चाचणीत शिक्षण विभाग ‘नापास’

By admin | Updated: December 22, 2015 00:39 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांतून घेतली जाणारी पायाभूत संकलित चाचणी परीक्षा -१ ऐनवेळी रद्द करण्यात आली.

दिवाळीनंतर होणारी चाचणी रद्द : धोरणात वेळेवर बदलप्रशांत देसाई  भंडाराप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांतून घेतली जाणारी पायाभूत संकलित चाचणी परीक्षा -१ ऐनवेळी रद्द करण्यात आली. यापूर्वी आॅक्टोबर २०१५ मध्ये ही परीक्षा घेण्याचे ठरले होते. मात्र नियोजन फिस्कटल्याने दिवाळीनंतरचा मुहूर्त ठरविण्यात आला. तथापि हा मुहूर्तसुद्धा कायमचा चुकल्याने राज्य शिक्षण मंडळच या संकलित चाचणीत ‘नापास’ झाल्याचे दिसून येत आहे.ही परीक्षा आता राज्यस्तरावरून घेण्यात येणार नाही, अशी सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी केली आहे. या निर्णयामुळे सहामाही परिक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता बळावली आहे. आॅक्टोबर महिन्यामध्ये प्रस्तावित संकलित मूल्यमापन- १ ही चाचणी दिवाळीनंतर घेण्यात येईल, असे कळविण्यात आले असले तरी आता राज्यस्तरावरून ही चाचणी घेण्यात येणार नाही किंवा या परीक्षेसाठी राज्यस्तरावरून प्रश्नोत्तर पत्रिका किंवा मास्टर कॉपी पुरविण्यात येणार नाही, असे संचालकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या शाळांनी विद्या परिषदेच्या निर्देशामुळे प्रथम भाषा व गणित या विषयाची संकलित मूल्यमापन - १ ही चाचणी घेतली नसेल त्यांनी त्यांच्या सोयीनुसार ही चाचणी शाळास्तरावर घ्यावी. आता राज्यस्तरावरून यंदा तीनऐवजी दोन चाचण्या घेण्यात येईल, असे परिषदेने म्हटले आहे. त्याचवेळी संकलित मूल्यमापन - २ ही चाचणी शासन निर्णयानुसार होणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रथम भाषा व गणित या विषयांची पायाभूत चाचणी जुलै २०१५ मध्ये घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले. परंतु पायाभूत चाचणीच्या प्रश्नोत्तर पत्रिका राज्य स्तरावरून पुरविण्याच्या कालावधीत तांत्रिक घोळ झाल्याने पायाभूत चाचणी सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये घेण्यात आली. अनेक ठिकाणी पायाभूत चाचणीत गैरप्रकारही झाले. संकलित मूल्यमापन - २ साठी प्रश्नपत्रिका संच वेळेत बनणे आणि पुरविणे शक्य नसल्याने ही परीक्षाच रद्द करण्याचा मध्यम मार्ग शिक्षण विभागाने निवडल्याचे बोलले जात आहे. अनेक शाळांमधून सराव म्हणून भाषा व गणित विषयांच्या चाचणी परीक्षा घेण्यात आली. स्नेहसंमेलन व इतर कार्यक्रमांना बाधा पोहोचेल, या उद्देशातून पायाभूत संकलित मूल्यमापन - १ ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. शासनाने घेतलेला संकलित चाचणीचा निर्णय खरोखरचं विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी होता कां? हाच आता संशोधनाचा विषय बनलेला आहे.