शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

पायाभूत संकलित चाचणीत शिक्षण विभाग ‘नापास’

By admin | Updated: December 22, 2015 00:39 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांतून घेतली जाणारी पायाभूत संकलित चाचणी परीक्षा -१ ऐनवेळी रद्द करण्यात आली.

दिवाळीनंतर होणारी चाचणी रद्द : धोरणात वेळेवर बदलप्रशांत देसाई  भंडाराप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांतून घेतली जाणारी पायाभूत संकलित चाचणी परीक्षा -१ ऐनवेळी रद्द करण्यात आली. यापूर्वी आॅक्टोबर २०१५ मध्ये ही परीक्षा घेण्याचे ठरले होते. मात्र नियोजन फिस्कटल्याने दिवाळीनंतरचा मुहूर्त ठरविण्यात आला. तथापि हा मुहूर्तसुद्धा कायमचा चुकल्याने राज्य शिक्षण मंडळच या संकलित चाचणीत ‘नापास’ झाल्याचे दिसून येत आहे.ही परीक्षा आता राज्यस्तरावरून घेण्यात येणार नाही, अशी सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी केली आहे. या निर्णयामुळे सहामाही परिक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता बळावली आहे. आॅक्टोबर महिन्यामध्ये प्रस्तावित संकलित मूल्यमापन- १ ही चाचणी दिवाळीनंतर घेण्यात येईल, असे कळविण्यात आले असले तरी आता राज्यस्तरावरून ही चाचणी घेण्यात येणार नाही किंवा या परीक्षेसाठी राज्यस्तरावरून प्रश्नोत्तर पत्रिका किंवा मास्टर कॉपी पुरविण्यात येणार नाही, असे संचालकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या शाळांनी विद्या परिषदेच्या निर्देशामुळे प्रथम भाषा व गणित या विषयाची संकलित मूल्यमापन - १ ही चाचणी घेतली नसेल त्यांनी त्यांच्या सोयीनुसार ही चाचणी शाळास्तरावर घ्यावी. आता राज्यस्तरावरून यंदा तीनऐवजी दोन चाचण्या घेण्यात येईल, असे परिषदेने म्हटले आहे. त्याचवेळी संकलित मूल्यमापन - २ ही चाचणी शासन निर्णयानुसार होणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रथम भाषा व गणित या विषयांची पायाभूत चाचणी जुलै २०१५ मध्ये घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले. परंतु पायाभूत चाचणीच्या प्रश्नोत्तर पत्रिका राज्य स्तरावरून पुरविण्याच्या कालावधीत तांत्रिक घोळ झाल्याने पायाभूत चाचणी सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये घेण्यात आली. अनेक ठिकाणी पायाभूत चाचणीत गैरप्रकारही झाले. संकलित मूल्यमापन - २ साठी प्रश्नपत्रिका संच वेळेत बनणे आणि पुरविणे शक्य नसल्याने ही परीक्षाच रद्द करण्याचा मध्यम मार्ग शिक्षण विभागाने निवडल्याचे बोलले जात आहे. अनेक शाळांमधून सराव म्हणून भाषा व गणित विषयांच्या चाचणी परीक्षा घेण्यात आली. स्नेहसंमेलन व इतर कार्यक्रमांना बाधा पोहोचेल, या उद्देशातून पायाभूत संकलित मूल्यमापन - १ ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. शासनाने घेतलेला संकलित चाचणीचा निर्णय खरोखरचं विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी होता कां? हाच आता संशोधनाचा विषय बनलेला आहे.