शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भरपावसाळ्यात ७७ गावांत पथदिव्यांची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST

तुमसर : ग्रामपंचायतीकडे विजेचे बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीने अनेक गावांतील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. काही गावांतील ...

तुमसर : ग्रामपंचायतीकडे विजेचे बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीने अनेक गावांतील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. काही गावांतील पाणीपुरवठा योजनांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पावसाळ्यात खेड्यांतील गावांत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामीण भागातील गाव, खेडे, तांडे अंधारमय झाले असून सरपटणारे जीव यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडे निधी नसल्यामुळे वीजबिल कुठून भरावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने पंधराव्या वित्त आयोगात निधी देण्याची घोषणा केली; परंतु अद्याप ग्रामपंचायतींना निधीची प्रतीक्षा आहे.

तुमसर तालुक्यातील ७७ ठिकाणी सध्या पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सायंकाळी संपूर्ण खेडेगाव अंधारमय होत आहे. ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी नसल्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल भरण्यास असमर्थ ठरले आहेत. ग्रामीण भागात पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना निधी देत होते, परंतु १५ व्या वित्त आयोगातून राज्य शासनाने ग्रामपंचायतींना निधी दिला नाही. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत आल्या आहेत. ग्रामपंचायतींपुढे पेच निर्माण झाला आहे.

ऐन पावसाळ्यात वीज वितरण कंपनीने थकीत बिलापोटी पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामीण परिसरात सरपटणारे जीव यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शेतशिवारात अनेक गावे वसलेली आहेत, त्यामुळे अधिकच धोका निर्माण झाला आहे.

पाणीपुरवठा योजना रडारवर : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने गावाला पाणीपुरवठा करण्याकरिता पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या आहेत. संपूर्ण गावाला या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाण्याचे वितरण करण्यात येते. पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकीत असल्याने त्यांचाही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात खेड्यांतील नागरिकांना विहिरींचे अशुद्ध पाणी प्यावे लागणार आहे. यामुळे नागरिकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासनाचे आदेश : चार दिवसांपूर्वी शासनाने पंधराव्या वित्त आयोगाचे जिल्हा परिषदेला निधी देण्याचे सांगितले. ऊर्जामंत्र्यांना साकडे घालण्यात आले. परंतु, संबंधित विभागाकडे रीतसर आदेश अजूनपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून अंधारमय वातावरणातच राहावे लागणार आहे.