शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसाळ्यात ७७ गावांत पथदिव्यांची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST

तुमसर : ग्रामपंचायतीकडे विजेचे बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीने अनेक गावांतील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. काही गावांतील ...

तुमसर : ग्रामपंचायतीकडे विजेचे बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीने अनेक गावांतील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. काही गावांतील पाणीपुरवठा योजनांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पावसाळ्यात खेड्यांतील गावांत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामीण भागातील गाव, खेडे, तांडे अंधारमय झाले असून सरपटणारे जीव यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडे निधी नसल्यामुळे वीजबिल कुठून भरावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने पंधराव्या वित्त आयोगात निधी देण्याची घोषणा केली; परंतु अद्याप ग्रामपंचायतींना निधीची प्रतीक्षा आहे.

तुमसर तालुक्यातील ७७ ठिकाणी सध्या पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सायंकाळी संपूर्ण खेडेगाव अंधारमय होत आहे. ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी नसल्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल भरण्यास असमर्थ ठरले आहेत. ग्रामीण भागात पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना निधी देत होते, परंतु १५ व्या वित्त आयोगातून राज्य शासनाने ग्रामपंचायतींना निधी दिला नाही. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत आल्या आहेत. ग्रामपंचायतींपुढे पेच निर्माण झाला आहे.

ऐन पावसाळ्यात वीज वितरण कंपनीने थकीत बिलापोटी पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामीण परिसरात सरपटणारे जीव यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शेतशिवारात अनेक गावे वसलेली आहेत, त्यामुळे अधिकच धोका निर्माण झाला आहे.

पाणीपुरवठा योजना रडारवर : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने गावाला पाणीपुरवठा करण्याकरिता पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या आहेत. संपूर्ण गावाला या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाण्याचे वितरण करण्यात येते. पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकीत असल्याने त्यांचाही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात खेड्यांतील नागरिकांना विहिरींचे अशुद्ध पाणी प्यावे लागणार आहे. यामुळे नागरिकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासनाचे आदेश : चार दिवसांपूर्वी शासनाने पंधराव्या वित्त आयोगाचे जिल्हा परिषदेला निधी देण्याचे सांगितले. ऊर्जामंत्र्यांना साकडे घालण्यात आले. परंतु, संबंधित विभागाकडे रीतसर आदेश अजूनपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून अंधारमय वातावरणातच राहावे लागणार आहे.