शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दमदार पावसामुळे नाल्यांना पूर, पऱ्हे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:57 IST

गत पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे करडी परिसरातील नाल्यांना पूर आला आहे. वैनगंगा नदी, तलाव व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली. मात्र, पेरणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाल्याने परे पाण्याखाली येवून सडण्याची भीती निर्माण झाली आहे तर शेतशिवारांना तलावाचे स्वरूप आले आहे. गावातील रस्ते चिखलमय झाली असून वाहतुकीची तारांबळ उडत आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे संकट : करडी परिसरातील शेतशिवारात पाणीच पाणी, रस्ते चिखलमय

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : गत पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे करडी परिसरातील नाल्यांना पूर आला आहे. वैनगंगा नदी, तलाव व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली. मात्र, पेरणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाल्याने परे पाण्याखाली येवून सडण्याची भीती निर्माण झाली आहे तर शेतशिवारांना तलावाचे स्वरूप आले आहे. गावातील रस्ते चिखलमय झाली असून वाहतुकीची तारांबळ उडत आहे.कोरडवाहू करडी परिसरात पावसाने मागील दहा वर्षांचा रेकार्ड मोडला आहे. खरीप हंगामाच्या सुरूवातीला कधी नव्हे ऐवढा धो...धो पाऊस पडला. संततधार पावसामुळे कौलारू घरे ओलेचिंब होवून नुकसानग्रस्त झाले.शेतशिवार जलमय झाल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसून येत आहे. करडी परिसरात अंदाजे ६० ते ६५ मिलिमिटर पर्यंत पाऊस झाल्याने कोरडे नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तलावात पाण्याचा साठा वाढला तर लहान बोड्या ओव्हरफ्लो झाल्याने मासोळ्यांची चढण वाढली आहे.उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या विहिरी भरल्या असून गावातील कच्च्या रस्त्यांवर चिखलच चिखलदिसून येत आहे. परिसरातील मोहगाव नाला, बोरगाव, खडकी, पांजरा, पालोरा, देव्हाडी नाला ओसंडून वाहत आहे. पेरण्या बरबाद होण्याच्या मार्गावर आहेत. आणखी पाऊस झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत आहे.रोगराईची भीतीपाच दिवस अतिवृष्टी झाल्याने गावातील नाल्या पाण्याचे भरल्या तर नाल्यांतील घाण पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषीत झाल्याने पाण्याचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच कच्या घरांचे नुकसान झाले असून अनेकांच्या भिंती पडल्या आहेत. नागरिकांची गरम केलेल्या पाण्याचा वापर करण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.