शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोरंभी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:37 IST

प्रसूतीसाठी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्याअभावी वेळेत पोहचता येत नाही. आजारी व्यक्तीचा रस्त्यातच मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. काम ...

प्रसूतीसाठी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्याअभावी वेळेत पोहचता येत नाही. आजारी व्यक्तीचा रस्त्यातच मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. काम लवकर व्हावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आयुध निर्माणी प्रशासनाने लक्ष देत रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

शहापूरचा, खरबीचा सर्विस रोड धोकादायक

भंडारा तालुक्यातील शहापूर येथील सर्विस रोड पूर्णच खचला असून येथे रस्त्यावर खड्डे पडले असतानाही दुर्लक्ष कायम आहे. नागरिकांचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार काय, असा संतप्त सवाल शिवसेना पदाधिकारी यांनी केला आहे. खरबी नाका येथील सर्विस रस्ताही खड्ड्यात गेल्याने अनेकांना दुखापत झाली आहे. याकडे प्रशासनाचे अनेक दिवसापासून दुर्लक्ष होत आहे. अनेकदा ट्रकचालक महामार्गावरील मुजबी, ठाणा, खरबी (नाका) येथे सर्विस रोडवरच वाहने उभी करतात. महामार्गावर थांबणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करून शहापूर येथील सर्विस रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख संजय आकरे यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अनिल गायधने, शहापूरचे नरेश लांजेवार, मोरेश्वर हटवार, नीलेश मोथरकर, अमोल जौंजाळ, सुनील सोमनाथे आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बाॅक्स

बळीराजा अनेक वर्षापासून त्रस्त

कोरंबी परिसरातील अनेक शेतकरी या रस्त्याने ये जा करतात. त्यांना अनेकदा भंडारा शहरात विविध कामांसाठी याच रस्त्याने यावे लागते. परंतु खड्डेमय रस्त्यांवरुन खते, बियाणे, शेती अवजारे नेताना खरीप हंगामात शेतकरी पुरते मेटाकुटीला आले आहेत. आयुध निर्माणी प्रशासन बळीराजाचा जीव जाण्याचा वाट पाहत आहे काय असा प्रश्न परिसरातील शेतकरी, शेतमजूर महिला विचारत आहेत. गणेशपूर येथूनही अनेक महिला शेतीकामांसाठी याच रस्त्याने प्रवास करतात. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.

कोट

भंडारा नागपूर महामार्गावरील मुजबी, ठाणा, खरबी (नाका) येथे सर्विस रोडवरच वाहने उभी असतात. यामुळे स्थानिक वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परिसरात अनेक अपघाताच्या घटना घडल्यावरही या सर्विस रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यांवरच उभ्या होणाऱ्या वाहनांवर महामार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. मात्र महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

संजय आकरे,

उपसरपंच,खरबी (नाका)