शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

लॉकडाऊनमुळे कामगारांना नोकरीची तर उद्योजकांना कामगार गावी जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST

इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना महामारीने पुन्हा एकदा उद्योग जगतावर मंदीचे सावट आणले आहे. यामुळे ...

इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना महामारीने पुन्हा एकदा उद्योग जगतावर मंदीचे सावट आणले आहे. यामुळे कामगारांना आपली नोकरी जाण्याची तर उद्योजकांना कामगार गावी परत जाण्याची भीती सतावू लागली आहे.

भंडारा जिल्ह्यात हातावर मोजण्याइतपतच उद्योग आहेत. त्यातही अन्य गावातून किंवा परप्रांतातून आलेले मजूर परत जातील याबाबत चिंता व्यक्त आहे. कामगारांना नोकरीची चातकासारखी प्रतीक्षा करावी लागत असते. लॉकडाऊन उघडल्यानंतर कामगार आपापल्या उद्योगधंद्यात कामावर परत आले होते. राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदीची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर ही स्थिती सामान्य रूपात येईल की नाही अशी धास्ती उद्योग जगतात पसरली आहे.

आधीच भंडारा जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात हवा तेवढा वाव नाही. त्यातही भंडारा जिल्ह्यातील अनेक बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगारही गेले आहेत. अशा स्थितीत लॉकडाऊनचा परिणाम गंभीर स्वरूपात पुन्हा एकदा जाणवण्याची धास्ती उद्योजक व कामगारांमध्ये व्याप्त आहे.

हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?

गतवर्षीच्या आठवणी कायम आहेत. रोजगार जाण्यानंतर काय परिस्थिती असते, याची कल्पना न केलेली बरी. पण आता १५ दिवस हाताला काम नाही तर दामही मिळणार नाही. त्यामुळे आता इथे राहून काय करणार असा सवाल आहे. आता एक दोन दिवसात उदरनिर्वाह संदर्भात विचार करणार आहे.

- लक्ष्मीकांत रंगारी, कामगार, भंडारा

हाताला काम मिळेल किंवा नाही याची शाश्वती नाही. गरिबीत अनेक दिवस काढले. पहिल्यांदा नोकरी मिळाली तेव्हा कुठे घरची स्थिती सुधारली. गतवर्षी सहा महिने हाताला काम मिळाले नाही. अनेक अडचणींना सामना करावा लागला. पुन्हा लॉकडाऊनला सामोो जाताना भीती वाटत आहे.

- मुकेश तेलरांधे, कामगार, भंडारा

मोठ्या मुश्किलीने नोकरी मिळत असते. लॉकडाऊननंतर नोकरी मिळायला त्रास गेला. आता पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची हिंमत राहिलेली नाही. अनेक दिवस चटणी भाकर खाऊन दिवस काढले आता पुन्हा ती परिस्थिती आठवली की अंगावर शहारे येतात.

- मधू कोहाड, कामगार, भंडारा

कामगार गावी परतला तर

खऱ्या अर्थाने कुणालाही लॉकडाऊन नकोच आहे, मात्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. कामगार घरी परतले तर ते पुन्हा येण्याच्या मानसिकतेत नसतात. याचा परिणाम उत्पादनावरही बसत असतो. स्थिती सामान्य व्हायलाच हवी, यात कामगार व उद्योजक दोघांचे हित आहे.

- नितीन दुरगकर, उद्योजक, भंडारा

गतवर्षी कोरोना काळात अनेक लहान-मोठे उद्योग बंद झाले. उद्योग जगताची गाडी हळूहळू रुळावर आली. आता पुन्हा लॉकडाऊन सावटामुळे उद्योग जगतात चिंता पसरली आहे. पंधरा दिवसांनंतर स्थिती सामान्य झाली नाही तर कामगार पुन्हा येतील की नाही, यात शंका आहे.

- डिम्पल मल्होत्रा, अध्यक्ष, डिस्ट्रिब्युटर कन्झ्युमर प्रोडक्ट

अनेक ठिकाणी कामगार कमी जास्त प्रमाणात आपआपल्या उद्योग क्षेत्रात परतले होते. गाडी पुन्हा रुळावर आली होती. मात्र लॉकडाऊनमुळे कामगारांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते. परंतु कोरोना संकटामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. कामगार आहे तर कंपनी आहे, असेच आम्ही मानतो.

- जयंत गज्जर, उद्योजक, भंडारा

गतवर्षीची आठवण : जनता कर्फ्यूनंतर लॉकडाऊनमध्ये अनेक कारखान्यांतील कामगार व मजूर पायीच गावाकडे निघाले होते.

डोक्यावर साहित्य व मुलाबाळांचे ओझे सहन करीत अनेक किलोमीटर उन्हातान्हात गावाचा रस्ता धरला होता.

गावात परतल्यावर अनेकांना रोजगारही मिळाला नाही. अनेकांना रोहयोचा आधार मिळाला तर काहींनी मजुरीची कामे केली.