शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी पऱ्हे करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

०७ लोक ०५ के विशाल रणदिवे अडयाळ : अडयाळ व परिसरातील तब्बल ८० लहान-मोठ्या गावांतील शेतकरी आज निसर्गाच्या लहरीपणामुळे ...

०७ लोक ०५ के

विशाल रणदिवे

अडयाळ :

अडयाळ व परिसरातील तब्बल ८० लहान-मोठ्या गावांतील शेतकरी आज निसर्गाच्या लहरीपणामुळे चिंताग्रस्त आहेत. पावसाचा थांगपत्ता नसल्याने पऱ्हे करपत आहेत. आधीच नेरला उपसा सिंचन व निसर्गाची साथ लाभली नाही तर पर्यायाने शेकडो शेतकऱ्यांना दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

अडयाळ आणि परिसरात आजही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. दुसरी खेदाची बाब म्हणजे जोपर्यंत शेतकरी पाणीपट्टी भरणार नाहीत तो पावेतो नेरला उपसा सिंचन सुरू होणार नसल्याने येथील शेतकरी डोक्यावर हात ठेवूनच आहे. नेरला उपसा सिंचन सुरू करावे म्हणून अडयाळ येथील पवणी तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष अमोल उराडे यांनी खासदार सुनील मेंढे यांना निवेदन दिले आहे. तसेच अडयाळ, चिखली, पिलांद्री, उमरी, केसलवाडा, सालेवाडा इत्यादी गावांतील शेतकरी मोठ्या आतुरतेने नेरला उपसा सिंचन सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत आहेत.

उपविभागीय अभियंता पागोरा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक १ कार्यालय आंबाडी येथून जी पत्रके वाटप झालीत, त्या मानाने गावागावातच जर पाणीपट्टी जमा करणारा एक अधिकारी वा कर्मचारी दिले असते तर काम सोपे झाले असते. प्रत्येक शेतकरी हा आंबाडी येथील कार्यालयात जाऊन पाणी पट्टी जमा करायला जाणार कसा, असाही प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांना एकूण तीन वर्षांची पाणीपट्टी भरणे आहे. नेरला उपसा सिंचन योजनेची बरीच कामे पूर्ण झालीच नाहीत, तर मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं?, यावेळी ही चर्चा मात्र अनेक गावात रंगत आहे. आज शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे आणि अशाही परिस्थितीत बोलायचे नाही काल असा प्रतिप्रश्न शेतकरी विचारीत आहेत. येत्या पाच दिवसांत पाणी बरसला नाही आणि नेरला उपसा सिंचनाचे पाणीही जर सोडले गेले नाही तर मग शेतकऱ्यांना दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही आणि असे होणे म्हणजे पुन्हा आर्थिक संकटात सापडणे, असा आहे.