शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

गोसीखुर्दमुळे हजारो हेक्टर धानाला 'नवसंजीवनी'

By admin | Updated: September 20, 2014 23:43 IST

गोसेखुर्द धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी, येथील ग्रामस्थांनी त्यांचे साहित्य जुन्याच गावात ठेवले आहे. धरण प्रशासनाने पाणी सोडल्याने ते गावात शिरले. त्यामुळे ग्रामस्थांना

गोसे (बुज.) : गोसेखुर्द धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी, येथील ग्रामस्थांनी त्यांचे साहित्य जुन्याच गावात ठेवले आहे. धरण प्रशासनाने पाणी सोडल्याने ते गावात शिरले. त्यामुळे ग्रामस्थांना याचा फटका बसला. ग्रामस्थांचे नुकसान होऊ नये म्हणून गोसे प्रकल्प कार्यालयाने गावकऱ्यांना सहा दिवसांचा अवधी दिला आहे. यादरम्यान पाणी सोडणे स्थिर राहणार आहे. गोसेचे पाणी धान पिकासाठी नवसंजीवनी ठरली आहे.या कालव्यातील पाणी चौरास पर्यंत जावून पोहचले आहे. धरणातील २४१ मीटरवर गेल्यावर वाहत्या पाण्याला वेग येणार आहे. शनिवारी धरणातील पाण्याचा जलस्तर २३९.६०० मीटर होता. प्रकल्पग्रस्तांना आपल्या जुन्या गावातून घराचे साहित्य काढून नवीन गावठाणात स्थानांतरण करण्याकरिता आज धरणाचा जलस्तर २३९.६०० मीटरवर स्थिर ठेवून जलस्तर वाढविण्याचे तात्पुरते थांबविलेले आहे. दुपारी ३ नंतर धरणाचे २ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहे. पण २५ तारखेच्या नंतर धरणातील जलस्तर वाढविण्याचे काम परत सुरू केल्या जाणार आहे.पुरेशा पाऊस न आल्यामुळे धानाचे पिक वाळण्याच्या मार्गावर होते. शेतजमिनीला भेगा पडणे सुरू झाले होते.गोसीखुर्द परिसरासोबतच चौरास भागातील शेतकऱ्यांनीही धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली. डावा कालवा विभागाने पाणी सोडले. दोन दिवसापासून पाथरी गावाजवळच्या डाव्या कालव्याचे दोन्ही दारे उघडण्यात आली आहेत. या कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी आहे. पण धरणाचा जलस्तर २४१.०० मिटरवर पोहचल्यावर कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याला गती येणार आहे. २४१.०० मिटरवरच नेरला उपसा सिंचन योजना सुरू होणार असल्यामुळे हजारो हेक्टर शेतजमिनीला सिंचन होणार आहे. डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा फायदा गोसेबुज, आकोट, चिचाळ, कोंढा, कोसरा, सोमनाळा, सेंद्रीखुर्द, सेंद्रीबुज, रनाळा, भावड, खैरी, नवेगाव, मांगली आदी गावातील हजारो हेक्टर शेतजमिनीला झाला आहे. यावर्षी पाऊस बरोबर झाला नसल्यामुळे शेतकऱ्याच्या धान पिकाचे नुकसान होत होते. पण गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हजारो हेक्टर धान पिकाला नवसंजिवणी मिळाली आहे. (वार्ताहर)