शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

जलस्त्रोत रिकामेच असल्याने दुष्काळसदृश स्थिती

By admin | Updated: August 13, 2014 23:39 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे आगमन उशिरा झाले. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची पाळी आली. पावसाचे नक्षत्र हळूहळू निघून जात आहेत. सासरा परिसरात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अल्प आहे.

सासरा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे आगमन उशिरा झाले. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची पाळी आली. पावसाचे नक्षत्र हळूहळू निघून जात आहेत. सासरा परिसरात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अल्प आहे. नुकत्याच आलेल्या पावसाने रोवणे कसेबसे आटोपण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाच्या लहरीपणावर उपाय नसल्याने येथील शेतकरी वर्ग भविष्यातील समस्यांनी चिंतातुर झाल्याचे दिसून येत आहे.सासरा व परिसरातील जलसंचय करणाऱ्या तलाव /बोड्या अद्यापही तहानलेल्याच आहे. धान पिकाच्या सुगीच्या काळापर्यंत सिंचन व्यवस्था होईल असे दिसून येत नाही. पावसाच्या अल्प प्रमाणाने शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत. सासरा व परिसर ग्रामीण भाग असल्याने या भागातील बहुतांश नागरिक शेतीवर निर्भर आहेत.गतवर्षी अतिवृष्टी तर यावर्षी अवर्षण अशी स्थिती निर्माण झाली आहे. रोवणी झालेल्या धान पिकाला जगविण्यासाठी थोडा फार पाऊस येत आहे. पण वातावरणातील तापमानही धानपिकावर रोगराईचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. पेरणी पासून रोवणीपर्यंत आधीच जर्जर झालेल्या शेतकऱ्यांना धानपिकाला जगविण्यासाठी महागड्या औषधी वापरावी लागणार आहे. ज्यांच्यावर उदरनिर्वाह अवलंबून आहे त्या शेतीसाठी शेतकऱ्यांना प्राणपणाने लढावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणाच्या समस्यांनी शेतकरी व्यथीत झाल्याचे दिसून येत आहे. जगाच्या पोशिंद्याच्या नशीबी केव्हा अच्छे दिन येतील हे न उलगडणारे कोडे आहे. उदरनिर्वाह, मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे वैवाहिक प्रश्न, कर्जाची परतफेड इत्यादी समस्या शेतकऱ्यांची झोप उडवत आहेत.अल्प पर्जन्यवृष्टीने धान पिकाला जगविण्यासाठी फारच जिकिरीचे होणार असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याचा उर्वरित कालावधी कमी असल्याने जलसाठे रिकामेच राहण्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)