शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शेतकरी आत्महत्या शासनाच्या उदासीन धोरणांमुळे

By admin | Updated: June 19, 2017 00:28 IST

संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे बळीराजावर आत्महत्याकरण्याची वेळ आली आहे, ..

प्रफुल्ल गुडघे पाटील : प्रकरण शेतकरी आत्मदहनाचे, लोकप्रतिनिधींनी घेतली शेंदरे कुटुबीयांची भेट लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे बळीराजावर आत्महत्याकरण्याची वेळ आली आहे, अशा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी लावला. जांभोरा येथील मृतक शेतकरी ताराचंद शेंदरे यांच्या कुटूंबीयांची भेट घेतल्यानंतर भंडारा येथील आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी, पिक विमा योजनेचा लाभ द्यावा, आर्थिक मदत देण्यात यावी अशीही मागणी केली. काँग्रेसतर्फे पिडीत कुटूंबीयाला दहा हजारांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, प्रमोद तितीरमारे, महेंद्र निंबार्ते, प्यारेलाल वाघमारे, मानिकराव ब्राम्हणकर, अमर रगडे आदी उपस्थित होते. यादरम्यान लोकमतच्या वृत्तानंतर राजकिय पक्षांनी याची दखल घेत जांभोरा येथे जावून शेंदरे कुटुंबियांची भेट घेतली. यात माजी आमदार तथा राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय सत्तेकार, सुरेश सज्जा आदींनी समावेश आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या भूषणावह नाहीत. शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे. शेंदरे कुटुंबियाची मी स्वत: भेट घेतली असून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यासाठी तहसीलदारांना तशी सूचना दिली आहे. मुलचंद शेंदरे यांचे बयाण नोंदविण्यासाठी पोलिसांना सांगितले आहे. विरोधक या प्रकरणाला राजकिय रंग देत आहेत.