शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

शेतकरी आत्महत्या शासनाच्या उदासीन धोरणांमुळे

By admin | Updated: June 19, 2017 00:28 IST

संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे बळीराजावर आत्महत्याकरण्याची वेळ आली आहे, ..

प्रफुल्ल गुडघे पाटील : प्रकरण शेतकरी आत्मदहनाचे, लोकप्रतिनिधींनी घेतली शेंदरे कुटुबीयांची भेट लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे बळीराजावर आत्महत्याकरण्याची वेळ आली आहे, अशा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी लावला. जांभोरा येथील मृतक शेतकरी ताराचंद शेंदरे यांच्या कुटूंबीयांची भेट घेतल्यानंतर भंडारा येथील आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी, पिक विमा योजनेचा लाभ द्यावा, आर्थिक मदत देण्यात यावी अशीही मागणी केली. काँग्रेसतर्फे पिडीत कुटूंबीयाला दहा हजारांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, प्रमोद तितीरमारे, महेंद्र निंबार्ते, प्यारेलाल वाघमारे, मानिकराव ब्राम्हणकर, अमर रगडे आदी उपस्थित होते. यादरम्यान लोकमतच्या वृत्तानंतर राजकिय पक्षांनी याची दखल घेत जांभोरा येथे जावून शेंदरे कुटुंबियांची भेट घेतली. यात माजी आमदार तथा राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय सत्तेकार, सुरेश सज्जा आदींनी समावेश आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या भूषणावह नाहीत. शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे. शेंदरे कुटुंबियाची मी स्वत: भेट घेतली असून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यासाठी तहसीलदारांना तशी सूचना दिली आहे. मुलचंद शेंदरे यांचे बयाण नोंदविण्यासाठी पोलिसांना सांगितले आहे. विरोधक या प्रकरणाला राजकिय रंग देत आहेत.