शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे कर्मचारी सामूहिक रजेवर

By admin | Updated: April 30, 2016 00:31 IST

वर्षभरापूर्वी रूजू झालेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधीक्षक डॉ. नलिनी भोयर यांच्या ...

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील प्रकार : केली बदलाची मागणी, सोमवारपासून आंदोलन तीव्र, कर्मचारी महासंघाचा इशाराभंडारा : वर्षभरापूर्वी रूजू झालेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधीक्षक डॉ. नलिनी भोयर यांच्या मनमानीला कंटाळून येथील अधिकारी व कर्मचारी शुक्रपासून सामूहिक रजेवर गेले. या प्रकारामुळे कृषी विभागात एकच खळबळ उडाली असून अधीक्षकांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी एकमेव मागणी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघ शाखा भंडारातर्फे वरिष्ठांना करण्यात आली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना अधिकारी, कर्मचारी सामूहिक रजेवर गेल्याने शेतीविषयक मुख्य कामे रेंगाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यांसदर्भात असे की, येथील राजीव गांधी चौक परिसरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आहे. वर्षभरापर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून डॉ.नलिनी भोयर या रूजू झाल्या. परंतु कर्मचाऱ्यांच्या मते, जेव्हापसून त्या रूजू झाल्या तेव्हापासून त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अपनामास्पद वागतात. प्रशासकीय कामासंदर्भात कारण नसतानाही अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. काही महिन्यांपासून त्यांच्या या वर्तवणुकीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ पोहचिवण्याच्या दृष्टीने छळ करीत असतात. यात, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ थांबविणे, बिनपगारी करणे, वार्षिक वेतनवाढ थांबविण्याच्या धमक्या देणे, सुडबुद्धीने कर्मचाऱ्यांचा पगार थांबविणे, पदोपदी बोलण्यावरून अपमानित करणे आदींचा समावेश आहे. त्यांच्या या वागणुकीबाबत आॅक्टोबर महिन्यातही महासंघातर्फे वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला होता, मात्र तेव्हाही कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. परिणामी त्यांच्या या अपमानास्पद कृतीमुळे त्यांची तात्काळ अन्यत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघ शाखा भंडारातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारपासून्न आंदोलन पुकारीत सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात अधीक्षक डॉ. नलिनी भोयर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)