शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅन्टी करप्शनच्या भीतीने वनाधिकारी धास्तावले!

By admin | Updated: February 2, 2015 22:59 IST

प्रत्येक कार्यालयात काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते. अनेकदा अधिकारी तथा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करतात. या प्रकारामुळे मागील काही

मुख्य प्रवेशद्वारावर होते नोंदणी : कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकांवर करडी नजरभंडारा : प्रत्येक कार्यालयात काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते. अनेकदा अधिकारी तथा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करतात. या प्रकारामुळे मागील काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. याची धास्ती घेवून भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली असून मुख्य प्रवेशद्वारावरच नोंदणी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. राज्यातील महसूल, वन विभाग तथा भूमिअभिलेख कार्यालयासह अन्य विभागातही मागील काही दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्ट्राचारी अधिकारी तथा कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनेकांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडून कारवाईचा सपाटा अ‍ॅन्टी करप्शन विभागाने सुरू केला आहे. यामुळे अनेक विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती बसली असली तरी लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही.नवीन वर्षातील महिनाभरातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात शंभरावर भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली आहे. भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेही याची धास्ती घेतली आहे. आतापर्यंत कधी नव्हे ते या विभागाच्या अधिकाऱ्याने मुख्य प्रवेशद्वारावरच एका कर्मचाऱ्याची नोंदणी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली आहे. हा कर्मचारी त्याच्याजवळील रजिस्टरमध्ये कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती तथा कर्मचाऱ्यांची इतंभूत माहिती नोंद करतो. त्यानंतरच त्या अभिव्यक्तीला कार्यालयात जाण्यासाठी प्रवेश दिल्या जातो. याबाबत लोकमत प्रतिनिधीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता येथील वरिष्ठ लिपिकाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे काम नसलेले नागरिकही नाहक येवून तासन्तास बसून असतात. यामुळे कार्यालयीन कामाचा खोळंबा होतो. अशा व्यक्तींवर वचक बसावा यासाठी नोंदणीची ही नवीन शक्कल काढल्याची माहिती दिली आहे. यामुळे काही प्रमाणात आळा बसल्याचेही या लिपीकाने सांगितले.बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात येते. मात्र येथील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी असे कुठलेही बंधन या कार्यालयाने घातलेले नाही. त्यामुळे नागरिक किंवा बाहेरील कर्मचाऱ्यांसाठी घातलेले हे बंधन सध्या कर्मचाऱ्यांमध्येच औत्सुक्याचे ठरले आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे वचक नसल्याने किंवा त्यांची बाहेर जाण्याची नोंदणी होत नसल्याने ते अनेकदा कार्यालयीन वेळेतच समोरील चहाटपरीवर दिसून येतात. अशा कर्मचाऱ्यासाठी वनाधिकाऱ्यांनी नोंदणी रजिस्टर ठेवावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. (शहर/नगर प्रतिनिधी )