शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अ‍ॅन्टी करप्शनच्या भीतीने वनाधिकारी धास्तावले!

By admin | Updated: February 2, 2015 22:59 IST

प्रत्येक कार्यालयात काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते. अनेकदा अधिकारी तथा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करतात. या प्रकारामुळे मागील काही

मुख्य प्रवेशद्वारावर होते नोंदणी : कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकांवर करडी नजरभंडारा : प्रत्येक कार्यालयात काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते. अनेकदा अधिकारी तथा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करतात. या प्रकारामुळे मागील काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. याची धास्ती घेवून भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली असून मुख्य प्रवेशद्वारावरच नोंदणी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. राज्यातील महसूल, वन विभाग तथा भूमिअभिलेख कार्यालयासह अन्य विभागातही मागील काही दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्ट्राचारी अधिकारी तथा कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनेकांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडून कारवाईचा सपाटा अ‍ॅन्टी करप्शन विभागाने सुरू केला आहे. यामुळे अनेक विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती बसली असली तरी लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही.नवीन वर्षातील महिनाभरातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात शंभरावर भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली आहे. भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेही याची धास्ती घेतली आहे. आतापर्यंत कधी नव्हे ते या विभागाच्या अधिकाऱ्याने मुख्य प्रवेशद्वारावरच एका कर्मचाऱ्याची नोंदणी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली आहे. हा कर्मचारी त्याच्याजवळील रजिस्टरमध्ये कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती तथा कर्मचाऱ्यांची इतंभूत माहिती नोंद करतो. त्यानंतरच त्या अभिव्यक्तीला कार्यालयात जाण्यासाठी प्रवेश दिल्या जातो. याबाबत लोकमत प्रतिनिधीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता येथील वरिष्ठ लिपिकाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे काम नसलेले नागरिकही नाहक येवून तासन्तास बसून असतात. यामुळे कार्यालयीन कामाचा खोळंबा होतो. अशा व्यक्तींवर वचक बसावा यासाठी नोंदणीची ही नवीन शक्कल काढल्याची माहिती दिली आहे. यामुळे काही प्रमाणात आळा बसल्याचेही या लिपीकाने सांगितले.बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात येते. मात्र येथील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी असे कुठलेही बंधन या कार्यालयाने घातलेले नाही. त्यामुळे नागरिक किंवा बाहेरील कर्मचाऱ्यांसाठी घातलेले हे बंधन सध्या कर्मचाऱ्यांमध्येच औत्सुक्याचे ठरले आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे वचक नसल्याने किंवा त्यांची बाहेर जाण्याची नोंदणी होत नसल्याने ते अनेकदा कार्यालयीन वेळेतच समोरील चहाटपरीवर दिसून येतात. अशा कर्मचाऱ्यासाठी वनाधिकाऱ्यांनी नोंदणी रजिस्टर ठेवावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. (शहर/नगर प्रतिनिधी )