शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

रेती तस्करांसाठी सुकळी रेतीघाट सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST

तुमसर तालुक्यातील सुकळी(देव्हाडी) येथे गावाजवळ दीड किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीचा रेती घाट आहे. या घाटातून रेती तस्करी जोमात ...

तुमसर तालुक्यातील सुकळी(देव्हाडी) येथे गावाजवळ दीड किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीचा रेती घाट आहे. या घाटातून रेती तस्करी जोमात सुरू आहे. वैनगंगेचे पात्र येथे विस्तीर्ण असून, नदीपात्रात उच्च गुणवत्तेची रेती आहे. या घाटाचा लिलाव झालेला नाही, परंतु नियमबाह्य रेतीचे उत्खनन सुरू आहे. याकडे खनिकर्म व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नदीपात्रातून आतापर्यंत लाखोंच्या रेतीची चोरी झाली आहे. तस्करांनी नदीपात्र ओरबडून काढले आहे. लिलाव झालेल्या घाटा सारखीच येथे उत्खनन करण्यात येते. गावापासून रेतीघाट लांब असल्याने कोणी फिरकत नाही. याच संधीचा फायदा रेती तस्कर घेत आहेत. येथील नदीपात्र विद्रूप झाले असून, पर्यावरणाला येथे धोका निर्माण झाला आहे, तसेच शासनाचा लाखोंचा महसूल दरवर्षी येथे बुडतो. महसूल प्रशासन या रेती घाटाचा लिलाव का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉक्स

चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक

सुकळी येथे नदीपात्रातील चोरीच्या रेतीची वाहतूक रोहा, बेटाळा मार्गाने सुरू आहे. भंडारा शहराजवळील दाभा येथे हा थेट रस्ता जातो. भंडारा शहरातून किंवा वरठी मार्गाने रेती नागपूरकडे वाहतूक केली जाते. परिसरातील काही रेती चोरटे तथा नागपूर येथील रेती कंत्राटदार रेतीची विल्हेवाट लावतात. रेती घाटातून रेतीची चोरी होत असल्याची माहिती सर्वांना आहे, परंतु येथे कधीच मोठी कारवाई झालेली दिसत नाही.

बॉक्स

केवळ रेती साठ्यावर कारवाई

सुकळी येथील नदीघाटातील रेती साठ्यावर प्रशासनाने कारवाई केलेली. काही दिवसांनंतर पुन्हा रेतीचोरी करण्यात येते. राजकीय पाठबळ असल्याने, येथे कधीच मोठी कारवाई होत नाही अशी चर्चा आहे.

रेती उत्खनन व रेती चोरी रोखण्याकरिता महसूल विभागाचे कडक नियम आहेत, परंतु येथे नियमांना ठेंगा दाखविला जात आहे. तालुका स्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत महसूल प्रशासनाचे अनेक अधिकारी आहेत, परंतु सुकळी येथील नदी घाटातील चोरी थांबली नाही.