शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्ह्यातील चालक वाहक म्हणतात, मुंबईची ड्यूटी नको रे बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई येथील बेस्ट सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या ...

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई येथील बेस्ट सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या विविध विभागातील राज्यातील चालक-वाहकांना मुंबई बेस्ट सेवेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र भंडारा जिल्ह्यातील चालक-वाहकातून मुंबईची ड्यूटी नको रे बाबा असे म्हणत अनेक जण नकार देत आहेत.

सुदैवाने भंडारा विभाग नियंत्रक कार्यालयातील एकाही चालक, वाहकाची गतवर्षी मुंबई येथील बेस्ट बस सेवेसाठी ड्यूटी लागली नव्हती. राज्यातील इतर महामंडळाच्या विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, धुळे, नांदेड, लातूर, जालना तसेच विदर्भातील अमरावती, अकोला इतर जिल्ह्यातील अनेक चालक वाहकांची मुंबई बेस्ट सेवेसाठी ड्यूटी लागली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक-वाहकांना मुंबईला पाठविण्याचे आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक चालक-वाहकांनी या बेस्ट बस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजून प्रत्यक्षात विभागीय कार्यालय, भंडाराला आदेश प्राप्त झालेले नाहीत. मात्र हे आदेश लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे.

कोट

मुंबईला कर्तव्यासाठी गेल्यावर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला कोरोना संसर्गाची लागण होऊ शकते, यामुळे अनेकजण मुंबई ड्यूटी नको रे बाबा असे म्हणू लागले आहेत.

गतवर्षी कोरोना काळात इतर राज्यातील मजुरांना सोडण्याचे कर्तव्य निभावले. सुदैवाने मुंबईला जावे लागले नाही. मात्र आता वय वाढत चालल्याने कोरोना संसर्गाची भीती वाटत आहे. ५० व यापुढील कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवू नये.

चालक.

कोट

इकडे सरकार मुंबईला कर्तव्यासाठी बोलावत आहे. पण दुसरीकडे त्याच चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांची जबाबदारी एसटी किंवा शासन घेत नाही. शिवाय कुटुंबीयांना नुकसान भरपाईही मिळत नसल्याने शासनाने चालक वाहकांचा विचार करावा.

वाहक

सुदैवाने जिल्ह्यातील एकाचीही मुंबईला ड्यूटी लागलीच नाही

गतवर्षी लॉकडाऊन नंतर जिल्ह्यातील अनेक चालक, वाहकांनी स्थलांतरित परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी कर्तव्य निभावले होते. यावेळी त्यांना पिण्याच्या पाण्यापासून घरी पोहचेपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. मात्र सुदैवाने जिल्ह्यातील एकाही चालक, वाहकाचा मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी कर्तव्य निभावण्यासाठी जावेच लागले नसल्याने कर्मचारी निश्चिंत होते. मात्र, आता पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून विविध विभागातील चालक वाहकांची नावे मागविण्यात येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे.