शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पिण्याचे पाणी नदी-नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:54 IST

भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे दोन कोटीची पाणीपुरवठा योजना दहा ते बारा वर्षापासुन धुळखात आहे.

ठळक मुद्देठाणा येथील प्रकार : पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे दोन कोटीची पाणीपुरवठा योजना दहा ते बारा वर्षापासुन धुळखात आहे. मागील आठवड्यापासुन पाणी सुरु करण्यात आले. मात्र पिण्याचे पाणी नळाला न येता नदी नाल्यात जात आहे. याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.याबाबत असे की, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या कार्यकाळातील १ कोटी ४६ लक्ष किमतीची महत्वाकांक्षी भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर झाली. ती सन २००७ मध्ये तिन कंत्राटदारानी ही योजनाचे बांधकाम केले. आजघडीला योजनेला दहा ते बारा वर्ष लोटले. मात्र नळधारकांच्या नळाला काही पाणी येत नाही. ही बाब हेरुन माजी सरपंच यांनी भंडारा पंचायत समिती आमसभेत प्रश्न उपस्थित केला. दोन महिन्यात अधिकारी व आमदाराकडून आश्वासन मिळाले. आज एक वर्ष लोटले. नविन ग्रामपंचायत कमेटी निर्माण झाली. त्यानुसार नविन पाणीपुरवठा समितीही तयार करण्यात आली. समितीचे कार्य कासवगतीने असल्याने गावांना यावर्षीही पिण्याचे मिळणार की नाही याची शास्वती कमीच आहे. याचे कारण दहा ते बारावर्षापासून मुख्य जलवाहिणी व वितरण नलिका प्लास्टीक व जमिनीतील आद्रता यांचा संयोजनाने पीव्हीसी पाईप लाईन ठिसूळ झालेली आहे.पाण्याचा वाढता दाब यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे भगदाळ पडत आहे. परिणामी पिण्याचे पाणी हे नदी-नाल्यामये जात आहे. उदा. दयावयाचे झाल्यास शहापूर येथील सेलोकर राईस मिल व नुतन हार्डवेअर दरम्यान मुख्य जलवाहिणीला मोठा भगदाड पडले असून पिण्याचे पाणी हे सांड नाल्याद्वारे वैनगंगा नदीला जाऊन मिळत आहे. याबाबद मिल मालकाने संबंधित विभागाला कळविले असता, आम्ही दुरुस्त करत नाही या शब्दात प्रकरणाला बगल देण्यात येत आहे. याबाबत संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.