शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

किटाडी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST

पालांदूर : पाणी म्हणजे जीवन आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून गावागावांत बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. ...

पालांदूर : पाणी म्हणजे जीवन आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून गावागावांत बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लाखनी तालुक्यातील किटाडी येथील गोड पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेलला तब्बल वर्षभरापासून गढूळ पाणी येत असून, अजूनही नादुरुस्त आहे. परिणामी भर उन्हाळ्यात पाणी टंचाईत आणखी भर पडली आहे.

पाणीटंचाई दूर करण्याकरिता प्रभाग २मध्ये नवे स्रोत निर्माण करणे नितांत गरजेचे आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच प्रभाग दोनमधील सार्वजनिक बोअरवेलला गढूळ पाणी येत आहे. बोअरवेल असलेल्या परिसरात काही घरी खासगी विहिरी आहेत. मात्र, शेजारी बऱ्याच घरी पाण्याचे वयक्तिक स्रोत नसल्याने गोरगरिबांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात धावपळ करावी लागते. प्रभाग दोनच्या नागरिकांनी बोअरवेल दुरुस्तीविषयी ग्रामपंचायतीला वेळोवेळी माहिती देऊनही, तात्पुरती दुरुस्ती करण्याचा देखावा करीत खर्च मोठा असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले. मात्र, बारा महिन्यांचा काळ लोटूनही सदर गढूळ पाण्याची बोअरवेल अजूनही दुरुस्त करण्यात आलेली नाही. बोअरवेल गोड पाण्याची म्हणून अख्ख्या किटाडी परिसरात सुपरिचित असल्याने ग्रामस्थांची नियमितपणे सुमार गर्दी असायची. या बोअरवेलच्या पाण्यावर अर्ध्यापेक्षा अधिक गाव आपली तहान भागवित होते. मात्र, आता गढूळ पाण्यामुळे बोअरवेल नादुरूस्त आहे. भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता, ग्रामपंचायतीने तत्काळ दुरुस्ती सुचवावी, अशी ग्रामस्थांची कळकळीची मागणी आहे. मात्र, ग्रामपंचायतीने सदर बोअरवेलचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याने पाण्याचा वापर करू नये, अशी सूचना ग्रामस्थांना केली आहे. भर उन्हाळ्यात विहिरी व बोअरवेलचे पाणी तळापर्यंत गेले आहे. परिणामी उन्हाळ्यात पिण्याचे गोड पाणी आणण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. प्रसंगी शेतशिवारातील सिंचनातूनही येणारे पाणी पिण्यासाठी आणावे लागते. स्थानिक प्रशासनाने पाणीटंचाईच्या प्रभागात तत्काळ पावले उचलत पाणी व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी पुढे आली आहे. गोड पाण्याची बोअरवेल दुरुस्तीकरिता मोठ्या खर्चाची बाब असल्याचे सांगण्यात आले. तो खर्च वरिष्ठ स्तरावरून करीत स्थानिकांची तहान शांत करावी. प्राथमिक स्तरातली पाण्याची समस्या अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलत मिळेल त्या मार्गाने निधीची तरतूद करीत बोअरवेलची दुरुस्ती करावी, अथवा नवी बोअरवेल तयार करावी.