शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

किटाडी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST

पालांदूर : पाणी म्हणजे जीवन आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून गावागावांत बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. ...

पालांदूर : पाणी म्हणजे जीवन आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून गावागावांत बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लाखनी तालुक्यातील किटाडी येथील गोड पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेलला तब्बल वर्षभरापासून गढूळ पाणी येत असून, अजूनही नादुरुस्त आहे. परिणामी भर उन्हाळ्यात पाणी टंचाईत आणखी भर पडली आहे.

पाणीटंचाई दूर करण्याकरिता प्रभाग २मध्ये नवे स्रोत निर्माण करणे नितांत गरजेचे आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच प्रभाग दोनमधील सार्वजनिक बोअरवेलला गढूळ पाणी येत आहे. बोअरवेल असलेल्या परिसरात काही घरी खासगी विहिरी आहेत. मात्र, शेजारी बऱ्याच घरी पाण्याचे वयक्तिक स्रोत नसल्याने गोरगरिबांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात धावपळ करावी लागते. प्रभाग दोनच्या नागरिकांनी बोअरवेल दुरुस्तीविषयी ग्रामपंचायतीला वेळोवेळी माहिती देऊनही, तात्पुरती दुरुस्ती करण्याचा देखावा करीत खर्च मोठा असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले. मात्र, बारा महिन्यांचा काळ लोटूनही सदर गढूळ पाण्याची बोअरवेल अजूनही दुरुस्त करण्यात आलेली नाही. बोअरवेल गोड पाण्याची म्हणून अख्ख्या किटाडी परिसरात सुपरिचित असल्याने ग्रामस्थांची नियमितपणे सुमार गर्दी असायची. या बोअरवेलच्या पाण्यावर अर्ध्यापेक्षा अधिक गाव आपली तहान भागवित होते. मात्र, आता गढूळ पाण्यामुळे बोअरवेल नादुरूस्त आहे. भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता, ग्रामपंचायतीने तत्काळ दुरुस्ती सुचवावी, अशी ग्रामस्थांची कळकळीची मागणी आहे. मात्र, ग्रामपंचायतीने सदर बोअरवेलचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याने पाण्याचा वापर करू नये, अशी सूचना ग्रामस्थांना केली आहे. भर उन्हाळ्यात विहिरी व बोअरवेलचे पाणी तळापर्यंत गेले आहे. परिणामी उन्हाळ्यात पिण्याचे गोड पाणी आणण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. प्रसंगी शेतशिवारातील सिंचनातूनही येणारे पाणी पिण्यासाठी आणावे लागते. स्थानिक प्रशासनाने पाणीटंचाईच्या प्रभागात तत्काळ पावले उचलत पाणी व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी पुढे आली आहे. गोड पाण्याची बोअरवेल दुरुस्तीकरिता मोठ्या खर्चाची बाब असल्याचे सांगण्यात आले. तो खर्च वरिष्ठ स्तरावरून करीत स्थानिकांची तहान शांत करावी. प्राथमिक स्तरातली पाण्याची समस्या अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलत मिळेल त्या मार्गाने निधीची तरतूद करीत बोअरवेलची दुरुस्ती करावी, अथवा नवी बोअरवेल तयार करावी.