शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्त गावाचे स्वप्न अपूर्णच

By admin | Updated: November 2, 2016 00:46 IST

अनेक आजारांचे मुळ कारण अस्वच्छतेमध्ये आहे. ग्रामीण भागातील वाढत्या अस्वच्छतेत उघड्यावर शौचास बसणे ...

बोजवारा : ग्रामीण भागातील शौचालये वापराविना, शासनाच्या अनुदानावर पाणीभंडारा : अनेक आजारांचे मुळ कारण अस्वच्छतेमध्ये आहे. ग्रामीण भागातील वाढत्या अस्वच्छतेत उघड्यावर शौचास बसणे प्रमुख कारणांपैकीच एक असल्याचे शासनाने विविध योजना राबवून गावे-तांडे हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केला. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शौचालय बांधण्यात आले. पण, उघड्यावर शौचास बसण्याच्या मानसिकतेत बदल झालेला नाही. शासनाच्या लाखो रूपयांच्या अनुदानावर पाणी फेरले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, २००४ पासून स्वच्छता अभियान व २००५ पासून संपूर्ण देशात निर्मल ग्रामयोजना अशा विविध योजना राबवून स्वच्छतेतून विकासाकडे वाटचाल करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर २००५ पासून ५०० रूपये अनुदान दिल्या जाऊ लागले. या अनुदानात वेळोवेळी वाढही करण्यात आली. हागणदारी मुक्त गावाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने एक ना अनेक प्रयत्न चालवले. शासनाने शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले. पण, आज ही शौचालय वापराबद्दल बहुतांश ग्रामीण जनतेच्या विचारात सकारात्मक बदल झाले नसल्याने शासनाच्या लाखो रूपयांच्या अनुदानावर पाणी फेरले जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात महिला-पुरूष प्रात:विधीसाठी गावकुशीच्या रस्त्यांचा उपयोग करतात. त्यामुळे गावातील मुख्य रस्ते घाणीने माखलेले असतात. गाव हागणदारी मुक्तीच्या आड येणाऱ्या काही कारणांपैकी प्रमुख म्हणून उल्लेख करता येणारे म्हणाले तर शासनाचे शौचालयासाठी आलेले अनुदान काही राजकीय नेते व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने लाटून थातूरमातूर बांधकाम दाखवून कागदावर शौचालय बांधल्याचे वाढते प्रकार, शासनाच्रूा योजनेचे फलित म्हणून ग्रामीण भागात शौचालय बांधण्यात आले. पण, यापैकी बऱ्याच लोकांनी शौचालयात प्रात:विधी केल्यास मनमोकळे होत नसल्याचा भास होतो म्हणून हे लोक शौचास उघड्यावर बसतात. त्यामुळे बांधलेल्या शौचालयाचा काही उपयोग होत नाही. (शहर प्रतिनिधी)लाभार्थ्याला १२ हजारांचे अनुदानराजीव आवास योजना, इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजनेचा शेवटचा २० ते २५ हजारांचा हप्ता मिळण्यासाठी शौचालय बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत संबंधित लाभार्थ्याला १२ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येत आहे.