शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

हागणदारीमुक्त गावाचे स्वप्न अपूर्णच

By admin | Updated: November 2, 2016 00:46 IST

अनेक आजारांचे मुळ कारण अस्वच्छतेमध्ये आहे. ग्रामीण भागातील वाढत्या अस्वच्छतेत उघड्यावर शौचास बसणे ...

बोजवारा : ग्रामीण भागातील शौचालये वापराविना, शासनाच्या अनुदानावर पाणीभंडारा : अनेक आजारांचे मुळ कारण अस्वच्छतेमध्ये आहे. ग्रामीण भागातील वाढत्या अस्वच्छतेत उघड्यावर शौचास बसणे प्रमुख कारणांपैकीच एक असल्याचे शासनाने विविध योजना राबवून गावे-तांडे हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केला. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शौचालय बांधण्यात आले. पण, उघड्यावर शौचास बसण्याच्या मानसिकतेत बदल झालेला नाही. शासनाच्या लाखो रूपयांच्या अनुदानावर पाणी फेरले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, २००४ पासून स्वच्छता अभियान व २००५ पासून संपूर्ण देशात निर्मल ग्रामयोजना अशा विविध योजना राबवून स्वच्छतेतून विकासाकडे वाटचाल करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर २००५ पासून ५०० रूपये अनुदान दिल्या जाऊ लागले. या अनुदानात वेळोवेळी वाढही करण्यात आली. हागणदारी मुक्त गावाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने एक ना अनेक प्रयत्न चालवले. शासनाने शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले. पण, आज ही शौचालय वापराबद्दल बहुतांश ग्रामीण जनतेच्या विचारात सकारात्मक बदल झाले नसल्याने शासनाच्या लाखो रूपयांच्या अनुदानावर पाणी फेरले जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात महिला-पुरूष प्रात:विधीसाठी गावकुशीच्या रस्त्यांचा उपयोग करतात. त्यामुळे गावातील मुख्य रस्ते घाणीने माखलेले असतात. गाव हागणदारी मुक्तीच्या आड येणाऱ्या काही कारणांपैकी प्रमुख म्हणून उल्लेख करता येणारे म्हणाले तर शासनाचे शौचालयासाठी आलेले अनुदान काही राजकीय नेते व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने लाटून थातूरमातूर बांधकाम दाखवून कागदावर शौचालय बांधल्याचे वाढते प्रकार, शासनाच्रूा योजनेचे फलित म्हणून ग्रामीण भागात शौचालय बांधण्यात आले. पण, यापैकी बऱ्याच लोकांनी शौचालयात प्रात:विधी केल्यास मनमोकळे होत नसल्याचा भास होतो म्हणून हे लोक शौचास उघड्यावर बसतात. त्यामुळे बांधलेल्या शौचालयाचा काही उपयोग होत नाही. (शहर प्रतिनिधी)लाभार्थ्याला १२ हजारांचे अनुदानराजीव आवास योजना, इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजनेचा शेवटचा २० ते २५ हजारांचा हप्ता मिळण्यासाठी शौचालय बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत संबंधित लाभार्थ्याला १२ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येत आहे.