शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

नाली बनली, पण पाणी जागचे हलेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

अड्याळ : गत अनेक वर्षांपासून गावात अनेक समस्या आहेत, त्या तर सुटल्याच नाहीत. अशोकनगरातही अनेक लहान-मोठ्या समस्या आहेत की ...

अड्याळ : गत अनेक वर्षांपासून गावात अनेक समस्या आहेत, त्या तर सुटल्याच नाहीत. अशोकनगरातही अनेक लहान-मोठ्या समस्या आहेत की ज्या येथील ग्रामपंचायत प्रशासन सोडवू शकले तर नाहीच, पण समस्या दिवसागणिक वाढतच चालल्याने आता ग्रामस्थ मात्र संताप व्यक्त करीत आहेत. येथे नाली बनली, पण पाणी जागच्या जागी असल्याने आरोग्याचा प्रश्न उदभवू शकतो.

ग्रामपंचायत प्रशासनसुध्दा गावातील तथा येथील एकामागून एक वाढणाऱ्या समस्यांमुळेसुध्दा हतबल झाल्यासारखे वाटत आहे. अशोकनगराला लागून असलेल्या नाल्या आता मोठ्या प्रमाणात तुडुंब भरलेल्या स्थितीत आहेत. यासाठी कुणी काय करायचे, कसे बोलायचे आणि कुणाला बोलायचे, ही एक डोकेदुखीच झाली आहे. अशोकनगरातील पाणी नाल्या असूनसुद्धा पुरेसा निघत नाही. ग्रामपंचायत प्रशासन आपली, कंत्राटदार आपली आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ग्रामस्थसुध्दा आपली बाजू मांडून मोकळे होताना दिसत आहेत. सांडपाणी वाहून जाण्यासाठी जोपर्यंत मार्ग मोकळा किंवा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत पाणी जिथल्या तिथेच राहणार असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

आज जे कच्च्या नालीत साचलेले सांडपाणी आहे, ते याआधी कुठून जायचे कुठे? नाल्यांची कामे जेव्हापासून सुरू झालीत तेव्हा सुरुवातीला रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यासाठी ग्रामपंचायतीमधील एका सदस्याने मोठी हिम्मत करून सरळ सरळ जेसीबीच्या साहाय्याने एक नालीच केली आणि जोपर्यंत पुढे नाली होत नाही, तोपर्यंत हे पाणी बोळीत जाणार, असेही त्यांनी बोलले. पण पाणीसुद्धा जागचे हलले नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे नियमानुसार जिथून पाणी जिथं जाणार होते, तो मार्ग का बंद करण्यात आला. ज्या मार्गाने जाणारे सांडपाणी तोही मार्ग जर मोकळा होत नसेल आणि अर्धवट नाल्यांचे बांधकामही पूर्ण होत नाही.

ग्रामस्थांच्या घरात, दुकानात हे सांडपाणी भरायचे का, असाही संतप्त सवाल उपस्थित होत आहे. राजेंद्र ब्राह्मणकर

यांच्या मते ज्या ठिकाणी आधी पाणी जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग होता, तोच झाला नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

रायभान सामृतवात म्हणाले, आता ज्या ठिकाणावरून पाणी बोळीत घातले जाणार तो प्रकार म्हणजे ‘वरणीचा पाणी आडयावर नेण्यासारखा आहे’. यासंदर्भात सरपंच जयश्री कुंभलकर म्हणाल्या, ग्रामपंचायत अडयाळ

येथील निर्माण झालेली समस्या येत्या काही दिवसांनी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.