शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

नाली बनली, पण पाणी जागचे हलेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

अड्याळ : गत अनेक वर्षांपासून गावात अनेक समस्या आहेत, त्या तर सुटल्याच नाहीत. अशोकनगरातही अनेक लहान-मोठ्या समस्या आहेत की ...

अड्याळ : गत अनेक वर्षांपासून गावात अनेक समस्या आहेत, त्या तर सुटल्याच नाहीत. अशोकनगरातही अनेक लहान-मोठ्या समस्या आहेत की ज्या येथील ग्रामपंचायत प्रशासन सोडवू शकले तर नाहीच, पण समस्या दिवसागणिक वाढतच चालल्याने आता ग्रामस्थ मात्र संताप व्यक्त करीत आहेत. येथे नाली बनली, पण पाणी जागच्या जागी असल्याने आरोग्याचा प्रश्न उदभवू शकतो.

ग्रामपंचायत प्रशासनसुध्दा गावातील तथा येथील एकामागून एक वाढणाऱ्या समस्यांमुळेसुध्दा हतबल झाल्यासारखे वाटत आहे. अशोकनगराला लागून असलेल्या नाल्या आता मोठ्या प्रमाणात तुडुंब भरलेल्या स्थितीत आहेत. यासाठी कुणी काय करायचे, कसे बोलायचे आणि कुणाला बोलायचे, ही एक डोकेदुखीच झाली आहे. अशोकनगरातील पाणी नाल्या असूनसुद्धा पुरेसा निघत नाही. ग्रामपंचायत प्रशासन आपली, कंत्राटदार आपली आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ग्रामस्थसुध्दा आपली बाजू मांडून मोकळे होताना दिसत आहेत. सांडपाणी वाहून जाण्यासाठी जोपर्यंत मार्ग मोकळा किंवा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत पाणी जिथल्या तिथेच राहणार असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

आज जे कच्च्या नालीत साचलेले सांडपाणी आहे, ते याआधी कुठून जायचे कुठे? नाल्यांची कामे जेव्हापासून सुरू झालीत तेव्हा सुरुवातीला रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यासाठी ग्रामपंचायतीमधील एका सदस्याने मोठी हिम्मत करून सरळ सरळ जेसीबीच्या साहाय्याने एक नालीच केली आणि जोपर्यंत पुढे नाली होत नाही, तोपर्यंत हे पाणी बोळीत जाणार, असेही त्यांनी बोलले. पण पाणीसुद्धा जागचे हलले नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे नियमानुसार जिथून पाणी जिथं जाणार होते, तो मार्ग का बंद करण्यात आला. ज्या मार्गाने जाणारे सांडपाणी तोही मार्ग जर मोकळा होत नसेल आणि अर्धवट नाल्यांचे बांधकामही पूर्ण होत नाही.

ग्रामस्थांच्या घरात, दुकानात हे सांडपाणी भरायचे का, असाही संतप्त सवाल उपस्थित होत आहे. राजेंद्र ब्राह्मणकर

यांच्या मते ज्या ठिकाणी आधी पाणी जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग होता, तोच झाला नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

रायभान सामृतवात म्हणाले, आता ज्या ठिकाणावरून पाणी बोळीत घातले जाणार तो प्रकार म्हणजे ‘वरणीचा पाणी आडयावर नेण्यासारखा आहे’. यासंदर्भात सरपंच जयश्री कुंभलकर म्हणाल्या, ग्रामपंचायत अडयाळ

येथील निर्माण झालेली समस्या येत्या काही दिवसांनी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.