शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नाली बनली, पण पाणी जागचे हलेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

अड्याळ : गत अनेक वर्षांपासून गावात अनेक समस्या आहेत, त्या तर सुटल्याच नाहीत. अशोकनगरातही अनेक लहान-मोठ्या समस्या आहेत की ...

अड्याळ : गत अनेक वर्षांपासून गावात अनेक समस्या आहेत, त्या तर सुटल्याच नाहीत. अशोकनगरातही अनेक लहान-मोठ्या समस्या आहेत की ज्या येथील ग्रामपंचायत प्रशासन सोडवू शकले तर नाहीच, पण समस्या दिवसागणिक वाढतच चालल्याने आता ग्रामस्थ मात्र संताप व्यक्त करीत आहेत. येथे नाली बनली, पण पाणी जागच्या जागी असल्याने आरोग्याचा प्रश्न उदभवू शकतो.

ग्रामपंचायत प्रशासनसुध्दा गावातील तथा येथील एकामागून एक वाढणाऱ्या समस्यांमुळेसुध्दा हतबल झाल्यासारखे वाटत आहे. अशोकनगराला लागून असलेल्या नाल्या आता मोठ्या प्रमाणात तुडुंब भरलेल्या स्थितीत आहेत. यासाठी कुणी काय करायचे, कसे बोलायचे आणि कुणाला बोलायचे, ही एक डोकेदुखीच झाली आहे. अशोकनगरातील पाणी नाल्या असूनसुद्धा पुरेसा निघत नाही. ग्रामपंचायत प्रशासन आपली, कंत्राटदार आपली आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ग्रामस्थसुध्दा आपली बाजू मांडून मोकळे होताना दिसत आहेत. सांडपाणी वाहून जाण्यासाठी जोपर्यंत मार्ग मोकळा किंवा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत पाणी जिथल्या तिथेच राहणार असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

आज जे कच्च्या नालीत साचलेले सांडपाणी आहे, ते याआधी कुठून जायचे कुठे? नाल्यांची कामे जेव्हापासून सुरू झालीत तेव्हा सुरुवातीला रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यासाठी ग्रामपंचायतीमधील एका सदस्याने मोठी हिम्मत करून सरळ सरळ जेसीबीच्या साहाय्याने एक नालीच केली आणि जोपर्यंत पुढे नाली होत नाही, तोपर्यंत हे पाणी बोळीत जाणार, असेही त्यांनी बोलले. पण पाणीसुद्धा जागचे हलले नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे नियमानुसार जिथून पाणी जिथं जाणार होते, तो मार्ग का बंद करण्यात आला. ज्या मार्गाने जाणारे सांडपाणी तोही मार्ग जर मोकळा होत नसेल आणि अर्धवट नाल्यांचे बांधकामही पूर्ण होत नाही.

ग्रामस्थांच्या घरात, दुकानात हे सांडपाणी भरायचे का, असाही संतप्त सवाल उपस्थित होत आहे. राजेंद्र ब्राह्मणकर

यांच्या मते ज्या ठिकाणी आधी पाणी जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग होता, तोच झाला नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

रायभान सामृतवात म्हणाले, आता ज्या ठिकाणावरून पाणी बोळीत घातले जाणार तो प्रकार म्हणजे ‘वरणीचा पाणी आडयावर नेण्यासारखा आहे’. यासंदर्भात सरपंच जयश्री कुंभलकर म्हणाल्या, ग्रामपंचायत अडयाळ

येथील निर्माण झालेली समस्या येत्या काही दिवसांनी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.