शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

डझनभर गावे सिंचनापासून वंचित

By admin | Updated: June 23, 2014 23:42 IST

आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. परंतु नियोजनाच्या अभावी प्रकल्प क्षेत्रापासून दोन ते तीन कि.मी. अंतरावरील गावासह तुमसर तालुक्यातील डझनभर गावे सिंचनापासून वंचित आहेत.

दिव्याखाली अंधार : बावनथडी प्रकल्पात नियोजनाचा अभावतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. परंतु नियोजनाच्या अभावी प्रकल्प क्षेत्रापासून दोन ते तीन कि.मी. अंतरावरील गावासह तुमसर तालुक्यातील डझनभर गावे सिंचनापासून वंचित आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यास कारणीभूत असल्याचे दिसून येते.मागील ३५ वर्षापूर्वीपासून बावनथडी प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरु होते. अनेक अडथळ््यातून त्यातून मार्ग काढण्यात आला. सुमारे १,४०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प मागीलवर्षी पूर्ण झाला. धरणात पाणी साठवणूक करण्यात आली. अनेक लहान वितरिकेची कामे शिल्लक आहेत.बावनथडी प्रकल्प हा तुमसर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या आदिवासी गाव सितेकसा येथे आहे. या प्रकल्प स्थळापासून दोन ते तीन कि.मी. अंतरावरील गावांना सिंचनाचा लाभ होत नाही. तालुक्यातील सुमारे डझनभर गावे सिंचनापासून वंचित आहेत. यात लेंडेझरी, खापा खुर्द, आलेसूर, रोंघा, लवादा मंगरली, गोबरवाही, सीतासावंगी, पौनारखारी, भोंडकी, गुडरी, खंदाड, सौदेपूर या गावांचा समावेश आहे. दिव्याखाली अंधार अशी येथील स्थिती आहे.सोंड्या उपसा सिंचन योजनेमुळे चांदपूर जलाशयाची सिंचन क्षमता वाढविण्यात आली. तशाच पद्धतीने गोबरवाही व खापा खुर्द परिसरात उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्याची गरज आहे.यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अनेक निवेदने देण्यात आली आहेत. शासन व प्रशासन या बाबींचा अभ्यास करीत असल्याचे उत्तर मिळत आहे.आधीच प्रकल्पांना पूर्णत्वास बरीच वर्षे लागली. तरीसुद्धा येथे नियोजनाचा अभाव दिसून येतो. सिंचनापासून वंचित गावाकरिता ठोस उपाययोजना न केल्यास किसान गर्जनाचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी आंदोलनाचा इशारा मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)