शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

आधी ओबीसी जनगणना करा, नंतर विभाजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

पालांदूर : केंद्र सरकार ओबीसी प्रवर्गाचे चार गटांत विभाजन करण्याच्या तयारीत आहे. ओबीसींचे २७ टक्के आरक्षण विभागले जाणार आहे. ...

पालांदूर : केंद्र सरकार ओबीसी प्रवर्गाचे चार गटांत विभाजन करण्याच्या तयारीत आहे. ओबीसींचे २७ टक्के आरक्षण विभागले जाणार आहे. असे विभाजन करण्यापूर्वी ओबीसींची जनगणना करा, अशी मागणी ओबीसी जनगणना परिषदेचे जिल्हा समन्वयक प्रा. उमेश सिंगनजुडे यांनी केली आहे.

सविधांनातील कलम ३४० नुसार २ ऑक्टोबर २०१७ ला न्यायमूर्ती जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची निर्मिती करण्यात आली. या आयोगाने नुकत्याच आपल्या शिफारशी केंद्र सरकारकडे सादर केल्या आहेत. केंद्रीय यादीतील दोन हजार ६३३ ओबीसी जातींची चार गटांत वर्गवारी होणार आहे. यात पहिल्या गटात एक हजार ६७४ जातीचा समावेश असून दोन टक्के आरक्षण मिळणार आहे. दुसऱ्या गटात ५०० जातींचा समावेश असून, ६ टक्के आरक्षण, तिसऱ्या गटात ३२८ जाती असून, नऊ टक्के आरक्षण आणि चौथ्या गटात ९७ जाती असून, दहा टक्के आरक्षण मिळणार आहे.

रोहिणी आयोगाने केलेल्या शिफारशी अयोग्य असून, यामुळे ओबीसी समाजात फुट पडणार असल्याचा आरोप प्रा. सिंगणजुडे यांनी केला आहे. ओबीसींची अद्यापही जनगणना झाली नसल्याने ओबीसींची निश्चित आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने प्रथम ओबीसींची सामाजिक व आर्थिक आधारावर जनगणना करावी नंतरच ओबीसी समाजाची विभागणी करावी, अशी मागणी ओबीसी संघटना सातत्याने करीत असताना त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ओबीसींची जणगणना झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा जनगणना परिषदेचे जिल्हा समन्वयक प्रा. उमेश सिंगनजुडे यांनी दिला आहे.