शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका

By admin | Updated: November 26, 2014 23:00 IST

देशाच्या संरक्षणासाठी शहिद झालेल्या या वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, समाजात आपुलकी, प्रेमाने जगा, आशावादी बना असे आवाहन करुन जिल्ह्यात पालांदूर हे एकमेव गाव आहे

पालांदुरात शहिदांना आदरांजली : सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले यांचे आवाहनपालांदूर : देशाच्या संरक्षणासाठी शहिद झालेल्या या वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, समाजात आपुलकी, प्रेमाने जगा, आशावादी बना असे आवाहन करुन जिल्ह्यात पालांदूर हे एकमेव गाव आहे की जिथे शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा सोहळा बघितल्यावर ऊर भरून येते. तुम्ही पालांदूरवासीय देशभक्त आहात, असे प्रतिपादन सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद पटोले यांनी केले.राज्याची राजधानी मुंबईवरील २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरपुत्रांना पालांदूर येथील बाजार चौकात आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल त्रिवेदी, पोलीस उपअधीक्षक (गृह) धरमशी, साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमतराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते दामाजी खंडाईत, इंद्रिस लध्दानी, सरपंच शुभांगी मदनकर उपस्थित होते.प्रास्ताविकात आयोजक तथा जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत म्हणाले, राजकारणात राहून समाजसेवा घडावी. हुताम्यांचे स्मरण करावे, देश प्रेमाची जाणीव निर्माण व्हावी आणि गावाची आदर्शकडे वाटचाल व्हावी या उदात्त हेतूने शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण व हुतात्मांच्या स्मृतींस्थळावर पुष्पगुच्छ पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. पोलीस विभागातर्फे शहिदांना मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत व भक्तीगीत गाण्यात आले. सुदाम खंडाईत यांनी ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा दिल्या.यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक हिरामण खंडाईत, शामराव खंडाईत, शंकरराव झलके, बाळा मोटघरे, आसाराम पंचभाई, भाऊराव भेंडारकर, अर्जून शेंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पालांदूर ग्रामीण रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिर, मधुमेह, रक्तदाब तपासणी घेण्यात आली. यावेळी ५४ दात्यांनी रक्त्दान केले. यात महिलांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जोपासली. याकरीता डॉ. पालांदूरकर, डॉ. छगन राखडे, डॉ. स्वप्नील आहारकर, डॉ. परवीन पठाण, विद्या ठाकरे, अर्चना अतकरी, घनश्याम टेंभुर्णे आदींनी सहकार्य केले. गावातील सर्व शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तथा जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन प्रा. संजय निंबेकर यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी केले.या कार्यक्रमाला वैशाली खंडाईत, तुळशीराम भुसारी, प्रतिभा सेलोकर, पंचायत समिती सदस्य धनंजय घाटबांधे, लिलाधर चेटूले, कृष्णा जांभूळकर, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विजय कापसे, हरिदास बडोले, कृष्णा धकाते, नारायण कडूकार, का.ना. निखाडे, ता.प. रणदिवे, गजानन शिवणकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली. (वार्ताहर)