शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

देशाची मान खाली जाईल असे कृत्य करु नका

By admin | Updated: December 3, 2015 00:46 IST

जगात सर्वात चांगली उद्देशिका आपल्या देशाच्या संविधानाची आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या देशाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होणार नाही याची जाणिव आपण सतत ठेवावी.

कार्यशाळेचे आयोजन : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे आवाहनभंडारा : जगात सर्वात चांगली उद्देशिका आपल्या देशाच्या संविधानाची आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या देशाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होणार नाही याची जाणिव आपण सतत ठेवावी. देशाच्या विकासासाठी सर्व भेदभाव विसरुन एकता, अखंडता व बंधुत्वाचा विचार सर्वांपर्यंत रुजविण्याचे काम आपण करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त हे वर्ष समता वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व पंचायत समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय भवनात झालेल्या या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे सदस्य प्रेमसागर गणविर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सहाय्यक आयुक्त डी.एन. धारगावे उपस्थित होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तीमत्व इतके बहुआयामी होते की, त्यांना समजून घ्यायला आपल्याला १०० वर्ष लागेल. देशातील सर्वात लांब असलेले हिराकुंड धरण बांधण्याची संकल्पना बाबासाहेबांची होती. सर्वांच्या कामाचे ८ तास असावे, पेन्शन फंड, प्रॅविडंट फंड, प्रसुती रजा, महिलांना संपत्तीमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेंबांनी काम केलं. जिथे-जिथे त्यांना अत्याचार, असमानता आणि विषमता दिसली त्यासाठी त्यांनी काम केले. बाबासाहेबांनी घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार व समान न्यायाची तरतूद केली आहे. तरीही अद्याप देशामध्ये ही समानता दिसत नाही आणि त्यासाठी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा करावा लागतो. अशा कायदयाची आपल्याला गरज पडणार नाही, अशी सर्वांची वर्तणूक असावी. तसेच या कायदयाचा गैरवापर होऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रेमसागर गणविर म्हणाले, जाती, धर्म, वंश या भितींच्या पलिकडे जावून आपल्या गावात एकता टिकून राहिल यासाठी सर्वांनी काम करावे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाची सखोल माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून करुन घ्यावी आणि कायदयाची जनजागृती तळागाळापर्यंत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यशाळेत भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटिल सहभागी झाले होते. या कार्यशाळेत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत पोलिस विभागाद्वारे लावण्यात येणाऱ्या कलमांविषयी पोलिस निरिक्षक प्रशांत कोलवाडकर आणि प्राध्यापक पाखमोडे यांनी मार्गदर्शन केले. कायद्याची माहिती वाडिभस्मे यांनी दिली. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त डि.एन. धारगावे यांनी संचालन विस्तार अधिकारी हुमने यांनी केले. (प्रतिनिधी)