शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

देशाची मान खाली जाईल असे कृत्य करु नका

By admin | Updated: December 3, 2015 00:46 IST

जगात सर्वात चांगली उद्देशिका आपल्या देशाच्या संविधानाची आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या देशाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होणार नाही याची जाणिव आपण सतत ठेवावी.

कार्यशाळेचे आयोजन : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे आवाहनभंडारा : जगात सर्वात चांगली उद्देशिका आपल्या देशाच्या संविधानाची आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या देशाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होणार नाही याची जाणिव आपण सतत ठेवावी. देशाच्या विकासासाठी सर्व भेदभाव विसरुन एकता, अखंडता व बंधुत्वाचा विचार सर्वांपर्यंत रुजविण्याचे काम आपण करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त हे वर्ष समता वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व पंचायत समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय भवनात झालेल्या या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे सदस्य प्रेमसागर गणविर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सहाय्यक आयुक्त डी.एन. धारगावे उपस्थित होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तीमत्व इतके बहुआयामी होते की, त्यांना समजून घ्यायला आपल्याला १०० वर्ष लागेल. देशातील सर्वात लांब असलेले हिराकुंड धरण बांधण्याची संकल्पना बाबासाहेबांची होती. सर्वांच्या कामाचे ८ तास असावे, पेन्शन फंड, प्रॅविडंट फंड, प्रसुती रजा, महिलांना संपत्तीमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेंबांनी काम केलं. जिथे-जिथे त्यांना अत्याचार, असमानता आणि विषमता दिसली त्यासाठी त्यांनी काम केले. बाबासाहेबांनी घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार व समान न्यायाची तरतूद केली आहे. तरीही अद्याप देशामध्ये ही समानता दिसत नाही आणि त्यासाठी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा करावा लागतो. अशा कायदयाची आपल्याला गरज पडणार नाही, अशी सर्वांची वर्तणूक असावी. तसेच या कायदयाचा गैरवापर होऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रेमसागर गणविर म्हणाले, जाती, धर्म, वंश या भितींच्या पलिकडे जावून आपल्या गावात एकता टिकून राहिल यासाठी सर्वांनी काम करावे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाची सखोल माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून करुन घ्यावी आणि कायदयाची जनजागृती तळागाळापर्यंत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यशाळेत भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटिल सहभागी झाले होते. या कार्यशाळेत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत पोलिस विभागाद्वारे लावण्यात येणाऱ्या कलमांविषयी पोलिस निरिक्षक प्रशांत कोलवाडकर आणि प्राध्यापक पाखमोडे यांनी मार्गदर्शन केले. कायद्याची माहिती वाडिभस्मे यांनी दिली. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त डि.एन. धारगावे यांनी संचालन विस्तार अधिकारी हुमने यांनी केले. (प्रतिनिधी)