शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

खराडी परिसरातील गावे दुष्काळग्रस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:36 IST

भंडारा तालुक्यातील खराडी-राजेदहेगाव परिसरातील गावे पेंच पाटबंधारे विभागाच्या पाण्यापासून वंचित राहिली आहे. ही गावे टेलवर असल्यामुळे पेंचचे पाणी पोहचण्या अगोदरच पेंचचे पाणी बंद झाले. परिणामी खराडी व राजेदहेगाव परिसरातील गावाला पाणी न मिळाल्याने धान पीक पुर्णत: सुकले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कखरबी (नाका) : भंडारा तालुक्यातील खराडी-राजेदहेगाव परिसरातील गावे पेंच पाटबंधारे विभागाच्या पाण्यापासून वंचित राहिली आहे. ही गावे टेलवर असल्यामुळे पेंचचे पाणी पोहचण्या अगोदरच पेंचचे पाणी बंद झाले. परिणामी खराडी व राजेदहेगाव परिसरातील गावाला पाणी न मिळाल्याने धान पीक पुर्णत: सुकले आहे.या सर्व प्रकरणाला पेंच पाटबंधारे विभाग शाखा खरबी नाका जबाबदार असल्याचे पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष निरंजन मुस्कारे यांनी म्हटले. खराडी-राजेदहेगाव पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष यांनी दोन्ही गावातील धान उत्पादक शेतकºयांची राजेदहेगाव येथे सभा घेण्यात आली.या सभेला जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती पे्रमदास वनवे उपस्थित होते. यांनी परिसरातील धान पिकांची पाहणी केली. प्रेमदास वनवे यांनी शासनाकडे ही गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पाणी वापर समितीने पेंच पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाण्याची मागणी केली. दोन दिवसात चार दिवसात पाणी देतो म्हणून शेतकºयांची फसवणूक केली आहे. मागील तीन वर्षापासून या गावांना पेंच पाटबंधारे विभागाचे पाणी मिळत नाही.एका पाण्यापासून धानाचे हातचे पिक जात आहे. या संपूर्ण प्रकरणाला पेंच पाटबंधारे विभाग जबाबदार आहे. त्यामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.शेतकºयांनी पीक लागवडीसाठी बँकेचे पिक कर्जे घेतले. ही कर्जे कशा प्रकारे फेडावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. यासाठी शेतकºयांच्या शिष्टमंडळाने ही गावे दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या प्रमुख मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रेमदास वनवे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष निरंजन मुस्कारे, उपाध्यक्ष अनिल हिवसे, सचिव श्याम पत्रे यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत राजेदहेगाव येथील सरपंच रामचंद्र लेंडे, ग्रामपंचायत खराडी येथील सरपंच संजय हिवसे, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधवांची उपस्थित होती.