शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

खराडी परिसरातील गावे दुष्काळग्रस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:36 IST

भंडारा तालुक्यातील खराडी-राजेदहेगाव परिसरातील गावे पेंच पाटबंधारे विभागाच्या पाण्यापासून वंचित राहिली आहे. ही गावे टेलवर असल्यामुळे पेंचचे पाणी पोहचण्या अगोदरच पेंचचे पाणी बंद झाले. परिणामी खराडी व राजेदहेगाव परिसरातील गावाला पाणी न मिळाल्याने धान पीक पुर्णत: सुकले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कखरबी (नाका) : भंडारा तालुक्यातील खराडी-राजेदहेगाव परिसरातील गावे पेंच पाटबंधारे विभागाच्या पाण्यापासून वंचित राहिली आहे. ही गावे टेलवर असल्यामुळे पेंचचे पाणी पोहचण्या अगोदरच पेंचचे पाणी बंद झाले. परिणामी खराडी व राजेदहेगाव परिसरातील गावाला पाणी न मिळाल्याने धान पीक पुर्णत: सुकले आहे.या सर्व प्रकरणाला पेंच पाटबंधारे विभाग शाखा खरबी नाका जबाबदार असल्याचे पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष निरंजन मुस्कारे यांनी म्हटले. खराडी-राजेदहेगाव पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष यांनी दोन्ही गावातील धान उत्पादक शेतकºयांची राजेदहेगाव येथे सभा घेण्यात आली.या सभेला जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती पे्रमदास वनवे उपस्थित होते. यांनी परिसरातील धान पिकांची पाहणी केली. प्रेमदास वनवे यांनी शासनाकडे ही गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पाणी वापर समितीने पेंच पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाण्याची मागणी केली. दोन दिवसात चार दिवसात पाणी देतो म्हणून शेतकºयांची फसवणूक केली आहे. मागील तीन वर्षापासून या गावांना पेंच पाटबंधारे विभागाचे पाणी मिळत नाही.एका पाण्यापासून धानाचे हातचे पिक जात आहे. या संपूर्ण प्रकरणाला पेंच पाटबंधारे विभाग जबाबदार आहे. त्यामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.शेतकºयांनी पीक लागवडीसाठी बँकेचे पिक कर्जे घेतले. ही कर्जे कशा प्रकारे फेडावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. यासाठी शेतकºयांच्या शिष्टमंडळाने ही गावे दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या प्रमुख मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रेमदास वनवे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष निरंजन मुस्कारे, उपाध्यक्ष अनिल हिवसे, सचिव श्याम पत्रे यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत राजेदहेगाव येथील सरपंच रामचंद्र लेंडे, ग्रामपंचायत खराडी येथील सरपंच संजय हिवसे, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधवांची उपस्थित होती.