शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्यात एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:33 IST

सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली असून आता पाऊस आला तरी पऱ्हे कामात येणार नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअपुऱ्या पावसाचा फटका : सात टक्के क्षेत्रात झालेली रोवणीही धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली असून आता पाऊस आला तरी पऱ्हे कामात येणार नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.भंडारा जिल्ह्यात खरीपाचे लागवड लायक क्षेत्रफळ दोन लाख चार हजार ९५२ हेक्टर आहे. सर्वाधिक एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. यासोबतच तूर, मुंग, उळीद, तिळ, सोयाबीन आणि ऊसाचे पिकही घेतले जाते. भंडारा हा भात उत्पादक जिल्हा या पिकासाठी पावसाची मोठी आवश्यकता असते. परंतु सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्रात झालेल्या पावसात शेतकºयांनी आपल्या शेतात पºहे टाकले. पºहे लावडलायक होत नाही तोच पावसाने पुन्हा दडी मारली. गत तीन आठवड्यापासून तर पावसाचा पत्ता नाही. या कालावधीत सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकºयांनी रोवणी केली. २० जुलैपर्यंत जिल्ह्यात १३ हजार १० हेक्टरवर रोवणी आटोपली होती. ती धान क्षेत्राच्या केवळ ७.१७ टक्के आहे.शेतात पºहे लागवडलायक झाले आहेत. पावसाचा पत्ता नाही. पºहे वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. टँकर लावून पºहे वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मोठा आर्थिक फटका शेतकºयांना बसत आहे. आता पाऊस आला तरी पºहे रोवणीच्या कामी येण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा शेतकºयांची जमीन पडीत राहण्याची भिती आहे.मूग व उळीद पेरणीला प्रारंभच नाहीजिल्ह्यात उळीद आणि मूगाचे पीक धानपिकासोबत घेतले जाते. परंतु यावर्षी अद्यापही या दोनही पिकाची लागवडच झाली नाही. तिळाच्या ५२४ हेक्टरपैकी ५५ हेक्टरवर लागत झाली आहे.तूर उत्तम, सोयाबीन धोक्यातगत काही वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी तूर आणि सोयाबीनकडे वळले आहे. जिल्ह्यात यंदा तुरीचे निर्धारित क्षेत्र ११ हजार ७४ हेक्टर आहे. कृषी विभागानुसार २० जुलैपर्यंत सात हजार ५७५ हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली. तर सोयाबीनचे क्षेत्र आठ हजार ११९ हेक्टर असून आतापर्यंत २२१ हेक्टरवर लागवड झाली आहे. सध्यस्थितीत तुरीची स्थिती उत्तम असली तरी सोयाबीन मात्र धोक्यात दिसत आहे.