शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:33 IST

सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली असून आता पाऊस आला तरी पऱ्हे कामात येणार नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअपुऱ्या पावसाचा फटका : सात टक्के क्षेत्रात झालेली रोवणीही धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली असून आता पाऊस आला तरी पऱ्हे कामात येणार नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे.भंडारा जिल्ह्यात खरीपाचे लागवड लायक क्षेत्रफळ दोन लाख चार हजार ९५२ हेक्टर आहे. सर्वाधिक एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. यासोबतच तूर, मुंग, उळीद, तिळ, सोयाबीन आणि ऊसाचे पिकही घेतले जाते. भंडारा हा भात उत्पादक जिल्हा या पिकासाठी पावसाची मोठी आवश्यकता असते. परंतु सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्रात झालेल्या पावसात शेतकºयांनी आपल्या शेतात पºहे टाकले. पºहे लावडलायक होत नाही तोच पावसाने पुन्हा दडी मारली. गत तीन आठवड्यापासून तर पावसाचा पत्ता नाही. या कालावधीत सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकºयांनी रोवणी केली. २० जुलैपर्यंत जिल्ह्यात १३ हजार १० हेक्टरवर रोवणी आटोपली होती. ती धान क्षेत्राच्या केवळ ७.१७ टक्के आहे.शेतात पºहे लागवडलायक झाले आहेत. पावसाचा पत्ता नाही. पºहे वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. टँकर लावून पºहे वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मोठा आर्थिक फटका शेतकºयांना बसत आहे. आता पाऊस आला तरी पºहे रोवणीच्या कामी येण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा शेतकºयांची जमीन पडीत राहण्याची भिती आहे.मूग व उळीद पेरणीला प्रारंभच नाहीजिल्ह्यात उळीद आणि मूगाचे पीक धानपिकासोबत घेतले जाते. परंतु यावर्षी अद्यापही या दोनही पिकाची लागवडच झाली नाही. तिळाच्या ५२४ हेक्टरपैकी ५५ हेक्टरवर लागत झाली आहे.तूर उत्तम, सोयाबीन धोक्यातगत काही वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी तूर आणि सोयाबीनकडे वळले आहे. जिल्ह्यात यंदा तुरीचे निर्धारित क्षेत्र ११ हजार ७४ हेक्टर आहे. कृषी विभागानुसार २० जुलैपर्यंत सात हजार ५७५ हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली. तर सोयाबीनचे क्षेत्र आठ हजार ११९ हेक्टर असून आतापर्यंत २२१ हेक्टरवर लागवड झाली आहे. सध्यस्थितीत तुरीची स्थिती उत्तम असली तरी सोयाबीन मात्र धोक्यात दिसत आहे.