शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कचऱ्याचा विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे

By admin | Updated: January 11, 2017 07:13 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात का दिरंगाई होते आहे. त्याला नेमके कोण जबाबदार आहे,

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात का दिरंगाई होते आहे. त्याला नेमके कोण जबाबदार आहे, या प्रश्नांची उत्तरे देणारा सविस्तर अहवाल १५ दिवसांत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारच्या सुनावणीत दिले. गेली सात वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यादरम्यान न्यायालयाने पालिकेला आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करुन कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते. तशी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला दिली. त्यात प्रगती न झाल्याने बांधकाम बंदीचा आदेश देण्यात आला. नऊ महिन्यांनी ते उठवताना डम्पिंगच्या प्रकल्पाची पूर्तता त्वरित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हा प्रश्न घनकचऱ्याचा आहे. तो प्रदूषणाशी संबंधित आहे. त्यामुळे न्यायालयाने ती याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे वर्ग केली. मागच्या सुनावणीवेळी पालिका आयुक्तांना १० जानेवारीला हजर राहण्याचे आदेश लवादाने दिले होते. त्यानुसार मंगळवारी आयुक्त ई. रवींद्रन हजर होते. मीरा-भार्इंदरमधील घनकचराप्रकरणी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर हे देखील हजर होते. केडीएमसीचा घनकचरा प्रकल्प राबविण्यात नेमकी कोणी दिरंगाई केली, त्याला कोण जबाबदार आहे, घनकचरा प्रकल्पासंबंंधित सगळ््यांची एक बैठक घ्यावी, त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही बोलवावे, या प्रकरणाची तपासणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना लवादाने सांगितले. (प्रतिनिधी)