शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आठवडी व गुरांच्या बाजाराला जिल्हा प्रशासनाची हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

भंडारा : कोरोना संसर्गाच्या लाटेमुळे प्रतिबंधित असलेला आठवडी आणि गुरांचा बाजार सुरू करण्याला जिल्हा प्रशासनाने हिरवी झेंडी दिली आहे. ...

भंडारा : कोरोना संसर्गाच्या लाटेमुळे प्रतिबंधित असलेला आठवडी आणि गुरांचा बाजार सुरू करण्याला जिल्हा प्रशासनाने हिरवी झेंडी दिली आहे. कोरोना नियमांचे पालन आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केला असून, त्याच्या अंमलबजावणीला बुधवारपासूनच प्रारंभ झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने दुसऱ्या लाटेत ब्रेक द चेन अंतर्गत आठवडी बैठे बाजार, गुरांचा बाजार तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भरणारे गुरांचे बाजार बंद आहेत. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक कुटुंबांचा यावर उदरनिर्वाह अवलंबून आहे; मात्र बाजारच बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तसेच सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांना जनावरे खरेदी व विक्री करणे गरजेचे आहे. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व आठवडी बाजार कंत्राटदारांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने आठवडी बाजार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी बुधवारपासून करण्यात येत आहे. आठवडी बाजार आणि गुरांचा बाजार सुरू झाल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गत अनेक दिवसांपासून आठवडी बाजार भरत नसल्याने भाजीपाला विक्रेत्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले होते. शहरातील विविध भागात गुजरी लावून भाजीपाल्याची विक्री होत होती; परंतु इतर व्यवसायांना आठवडी बाजार भरत नसल्याने प्रतिबंध होता. आता आठवडी बाजार सुरू झाल्याने सर्वांना दिलासा मिळणार आहे; मात्र या ठिकाणी कोरोना संसर्गाच्या संपूर्ण नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

शनिवार, रविवारी भरणाऱ्या बाजारांना परवानगी नाही

आठवडी व गुरांचा बाजार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहील. शनिवारी आणि रविवारी या बाजारांना परवानगी राहणार नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास बाजार आयोजक जबाबदार राहणार आहेत. बाजारात मास्क, सॅनिटायझेशन व सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे. बाजारात गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. दुकानदार आणि नागरिकांसाठी जागा निश्चित करून दोरी व बांबूद्वारे बॅरेकेटींग करावे लागणार आहे, तसेच कार्यवाही सुनिश्चिततेसाठी समिती नेमून साप्ताहिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावे लागेल.