शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी व गुरांच्या बाजाराला जिल्हा प्रशासनाची हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

भंडारा : कोरोना संसर्गाच्या लाटेमुळे प्रतिबंधित असलेला आठवडी आणि गुरांचा बाजार सुरू करण्याला जिल्हा प्रशासनाने हिरवी झेंडी दिली आहे. ...

भंडारा : कोरोना संसर्गाच्या लाटेमुळे प्रतिबंधित असलेला आठवडी आणि गुरांचा बाजार सुरू करण्याला जिल्हा प्रशासनाने हिरवी झेंडी दिली आहे. कोरोना नियमांचे पालन आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केला असून, त्याच्या अंमलबजावणीला बुधवारपासूनच प्रारंभ झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने दुसऱ्या लाटेत ब्रेक द चेन अंतर्गत आठवडी बैठे बाजार, गुरांचा बाजार तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भरणारे गुरांचे बाजार बंद आहेत. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक कुटुंबांचा यावर उदरनिर्वाह अवलंबून आहे; मात्र बाजारच बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तसेच सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांना जनावरे खरेदी व विक्री करणे गरजेचे आहे. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व आठवडी बाजार कंत्राटदारांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने आठवडी बाजार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी बुधवारपासून करण्यात येत आहे. आठवडी बाजार आणि गुरांचा बाजार सुरू झाल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गत अनेक दिवसांपासून आठवडी बाजार भरत नसल्याने भाजीपाला विक्रेत्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले होते. शहरातील विविध भागात गुजरी लावून भाजीपाल्याची विक्री होत होती; परंतु इतर व्यवसायांना आठवडी बाजार भरत नसल्याने प्रतिबंध होता. आता आठवडी बाजार सुरू झाल्याने सर्वांना दिलासा मिळणार आहे; मात्र या ठिकाणी कोरोना संसर्गाच्या संपूर्ण नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

शनिवार, रविवारी भरणाऱ्या बाजारांना परवानगी नाही

आठवडी व गुरांचा बाजार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहील. शनिवारी आणि रविवारी या बाजारांना परवानगी राहणार नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास बाजार आयोजक जबाबदार राहणार आहेत. बाजारात मास्क, सॅनिटायझेशन व सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे. बाजारात गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. दुकानदार आणि नागरिकांसाठी जागा निश्चित करून दोरी व बांबूद्वारे बॅरेकेटींग करावे लागणार आहे, तसेच कार्यवाही सुनिश्चिततेसाठी समिती नेमून साप्ताहिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावे लागेल.