शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

आठवडी व गुरांच्या बाजाराला जिल्हा प्रशासनाची हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

भंडारा : कोरोना संसर्गाच्या लाटेमुळे प्रतिबंधित असलेला आठवडी आणि गुरांचा बाजार सुरू करण्याला जिल्हा प्रशासनाने हिरवी झेंडी दिली आहे. ...

भंडारा : कोरोना संसर्गाच्या लाटेमुळे प्रतिबंधित असलेला आठवडी आणि गुरांचा बाजार सुरू करण्याला जिल्हा प्रशासनाने हिरवी झेंडी दिली आहे. कोरोना नियमांचे पालन आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केला असून, त्याच्या अंमलबजावणीला बुधवारपासूनच प्रारंभ झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने दुसऱ्या लाटेत ब्रेक द चेन अंतर्गत आठवडी बैठे बाजार, गुरांचा बाजार तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भरणारे गुरांचे बाजार बंद आहेत. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक कुटुंबांचा यावर उदरनिर्वाह अवलंबून आहे; मात्र बाजारच बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तसेच सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांना जनावरे खरेदी व विक्री करणे गरजेचे आहे. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व आठवडी बाजार कंत्राटदारांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने आठवडी बाजार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी बुधवारपासून करण्यात येत आहे. आठवडी बाजार आणि गुरांचा बाजार सुरू झाल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गत अनेक दिवसांपासून आठवडी बाजार भरत नसल्याने भाजीपाला विक्रेत्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले होते. शहरातील विविध भागात गुजरी लावून भाजीपाल्याची विक्री होत होती; परंतु इतर व्यवसायांना आठवडी बाजार भरत नसल्याने प्रतिबंध होता. आता आठवडी बाजार सुरू झाल्याने सर्वांना दिलासा मिळणार आहे; मात्र या ठिकाणी कोरोना संसर्गाच्या संपूर्ण नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

शनिवार, रविवारी भरणाऱ्या बाजारांना परवानगी नाही

आठवडी व गुरांचा बाजार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहील. शनिवारी आणि रविवारी या बाजारांना परवानगी राहणार नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास बाजार आयोजक जबाबदार राहणार आहेत. बाजारात मास्क, सॅनिटायझेशन व सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे. बाजारात गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. दुकानदार आणि नागरिकांसाठी जागा निश्चित करून दोरी व बांबूद्वारे बॅरेकेटींग करावे लागणार आहे, तसेच कार्यवाही सुनिश्चिततेसाठी समिती नेमून साप्ताहिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावे लागेल.