शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जिल्ह्यातील ५०४४ घरकूल अपूर्णावस्थेत

By admin | Updated: July 18, 2016 01:33 IST

केंद्र व राज्य शासन पुरस्कृत मागील दहा वर्षापुर्वी घरकुल योजनेचा लाभप्राप्त जिल्ह्यातील सुमारे ५,०४४ लाभार्थ्यांची घरकुले ...

ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा ठपका : तीन महिन्यात बांधकाम पूर्ण करण्याची तंबी प्रमोद प्रधान लाखांदूर केंद्र व राज्य शासन पुरस्कृत मागील दहा वर्षापुर्वी घरकुल योजनेचा लाभप्राप्त जिल्ह्यातील सुमारे ५,०४४ लाभार्थ्यांची घरकुले अपूर्णावस्थेत असल्याचा ठपका थेट ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी ठेवला आहे. त्यानुसार अपूर्णावस्थेतील घरकुले केवळ तीन महिन्यात पूर्ण करण्याची तंबी देतांना लाभार्थ्यांनी उचल केलेला अग्रीम धनादेशाची फेरवसुली करतांनाच स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यासह फौजदारी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र व राज्य शासन पुरस्कृत इंदिरा आवास, रमाई आवास आदी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबाना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेच्या लाभासाठी पात्र काही कुटूंबाना मंजूरी मिळताच बांधकाम प्रगतीनुसार अग्रीम धनादेश देखील प्रदान करण्यात आले होते. मात्र तब्बल १० वर्षापुर्वी घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांकरवी अग्रीम धनादेशाची उचल होवूनही हजारो घरकुले अपूर्णावस्थेतच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान काही लाभार्थ्यांनी अग्रीम धनादेशाची उचल करुन घरकुल बांधकाम सुरु न केल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. संबंधित लाभार्थ्यांकडून उचल केलेल्या अग्रीम धनादेशची रक्कम वसुल करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. निर्देशानुसार कोणी लाभार्थी उचल केलेल्या रक्कमेची फेरवसुली करतांना टाळाटाळ करीत असल्यास संबंधीतांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यासह फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे. दरम्यान पुरेशा निधीअभावी अनेक घरकुल लाभार्थ्यांकडे शौचालय नसल्याचे शासनाला आढळून आल्याने संबंधीत लाभार्थ्यांला स्वच्छ भारत अभियान अथवा मग्रारोहयो अंतर्गत शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निदे्रश देखील देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील बेघर गरीब कुटूंबाना मागील अनेक वर्षापासून घरकुलाचा लाभ चालविला आहे. शासन प्रशासन या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना ५ हजाराहून अधिक घरकुले अपूर्णावस्थेत असल्याचे आढळून येणे चिंताजनक ठरले असून सदर गैरप्रकारासाठी खुद्द लाभार्थ्यांची उदासिनता कारणीभूत आहे. दरम्यानच्या काळात लाभार्थ्यांची घरकुले अपूर्णावस्थेत आहेत. ती घरकुले शासन निर्देशानुसार तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. वासुदेव तोंडरे, उपसभापती, पंचायत समिती, लाखांदूर पीएमएवाय अंतर्गत मिळणार लाभ सन २०११च्या आर्थिक, सामाजिक व जातनिहाय सर्व्हेक्षणानुसार यावर्षीपासून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास आयोजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे. सदर योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांची नावे येत्या १५ आॅगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेतून प्रस्तावित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. सदर योजना शासनाने नव्याने कार्यान्वित करतांना यापूर्वी घरकुल योजनेपासून वंचित निर्विवाद लाभार्थ्यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.