शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

अड्याळवासीयांना दूषित पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:04 IST

अड्याळ येथील मागील बऱ्याच दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरु आहे. पाणी विकत घेऊन प्यायची वेळ नागरिकांवर येवून ठेपली आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते.

ठळक मुद्देनागरिकांना आर्थिक फटका : प्रशासन लक्ष देईल काय?, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, अनेकांचे आरोग्य धोक्यात

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ येथील मागील बऱ्याच दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरु आहे. पाणी विकत घेऊन प्यायची वेळ नागरिकांवर येवून ठेपली आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते.अड्याळ ग्रामपंचायत मधील सरपंच तथा सदस्यगण ग्रामस्थांकरवी ठिकठिकाणी एकच समस्यांचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे दूषित पाण्याचा पुरवठा होय. विशेष म्हणजे पाणी जर दूषित येत असेल तर ते उकळून गाळून प्यावे असा उपरोधीक सल्लाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात येत असल्याने ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या आहेत. दूषित पाणी पुरवठ्याची समस्या जुनी असली तरी वर्षातून किती दिवस दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला याची नोंद प्रशासनाकडे नसली तरी कुठल्या ग्राहकाकडे किती पाणीपट्टी कर थकीत आहे याची मात्र तंतोतंत नोंद ग्रामपंचायतकडे आहे. मात्र दूषित पाण्याच्या पुरवठ्यावर तेच प्रशासन मुग गिळून आहे.माहितीनुसार ज्या केंद्रातून पाण्याचा पुरवठा केला जातो त्या यंत्राची क्षमता कमी असून पाण्याचा पुरवठा दूषित होत असतो. दरवर्षी पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. फक्त ब्लिचिंग घातल्याने पाणी शुद्ध होत नाही. त्याला उपाय तरी काय अशी उत्तरे दिली जातात.ग्रामविकास अधिकारी तथा सरपंचाच्या मते जिल्हा परिषदेने लावून दिलेल्या आरो चा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येते. परंतु दोन रुपयात २० लिटर पाणी प्रत्येकालाच नेणे शक्य बाब नाही.अड्याळ या गावात दूषित पाण्याची समस्या मुख्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.यावर कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही. ज्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र होते त्या ठिकाणची दूरवस्था पाहून प्रशासनाचा उदासीन कारभार लक्षात येतो. या समस्येकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.नदीतून येणारे पाणी पिवळसर येत आहे. ब्लिचिंग पावडर, तुरटी घातल्यानंतरही ते पाणी शुद्ध करण्यात येते. यावरही नागरिकांनी आरो चे पाणी विकत घ्यावे तसेच नदीचे पाणी पिऊ नये.-जयश्री कुंभलकर,सरपंच, अड्याळ.