शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याने व्याकूळ वन्यजीव शिकाऱ्यांच्या निशाण्यावर

By admin | Updated: May 6, 2015 00:43 IST

उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडते. परिणामी पाण्याच्या शोधात असलेले वन्यप्राणी मानवी ...

जंगलातील जलस्रोत पडले कोरडे : वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धावभंडारा : उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडते. परिणामी पाण्याच्या शोधात असलेले वन्यप्राणी मानवी वसाहतीकडे येत आहेत. नेमके हेच हेरून शिकाऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या शिकारीचा सपाटा लावला आहे. शिकारीनंतर या प्राण्यांच्या मांसाची विक्री होत असताना वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करीत आहेत.भंडारा वन विभागाकडे शेकडो एकर वनक्षेत्र आहे. लगतच उमरेड कऱ्हांडला, नागझिरा, आंबागड या वनविभागाच्या सीमा व क्षेत्र आहे. उन्हाच्या तीव्रतेने वन क्षेत्रातील पानवठे कोरडे पडत आहेत. परिणामी तृष्णा भागविण्याकरिता पाण्याच्या शोधात भटकंती करीत फिरणारे हरिण, रोही, मोर, ससे, रानडुकरे हे वन्यप्राणी आढळतात. हे प्राणी भटकंती करीत मानवी वसाहती लगत येत आहेत. वनक्षेत्राच्या बाहेर येताच या वन्यप्राण्यांवर शिकारी नजर ठेवून असतात. तुमसर व पवनी तालुक्यात शिकारीच्या बऱ्याच टोळ्या असून या टोळ्यांकडे गावठी बंदूक, भाले, नायलॉन दोरीचे जाळे तसेच लोखंडी सापळे आहेत. या लोखंडी सापळ्याला शिकारी ‘टिचकारा’ म्हणतात. वसाहतीलगत असलेल्या ओलिताच्या शेताजवळ बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी सोय केलेली आहे.रात्रीच्या वेळी वन्यप्राणीदेखील शोध लावत याच ठिकाणी आपली तहान भागवतात. अशा ठिकाणी शिकाऱ्यांकडून वन्यप्राण्यांचा मार्ग काढला जातो व नंतर खात्री झाल्यावर या परिसरात सापळे लावले जाते. या सापळ्यात अडकलेल्या प्राण्यांना शिकारी शस्त्रााने मारतात. सापळ्यात प्राणी अडकला नाही तर नंतर गावठी बंदुकीने शिकार केली जाते. शिकार केल्यानंतर या प्राण्यांच्या मांसाची टोळीतील सदस्यांमध्ये हिस्सेवाटणी होते. हिस्सेवाटप झाल्यावर शिल्लक असलेल्या मांसाची हे परिचितांना विक्री करतात. (शहर प्रतिनिधी)बारुदऐवजी माचिसच्या गुलाचा वापरशिकाऱ्यांकडे असलेल्या गावठी बंदुकीला ‘भरमार’ म्हणतात. याला लागणारी बारुद मान्यताप्राप्त दुकानातून केवळ परवानाधारक शस्त्र असणाऱ्यांना मिळते. शिकाऱ्यांकडे असलेल्या बंदुकीला कोणताही परवाना नसतो. म्हणून हे लोक बारुदीऐवजी ‘तांबड्या फॉस्फोरस’चा वापर करतात. तांबडा फॉस्फोरससाठी आगपेटी (माचिस) मधील काड्यावरील गूल करून याचा वापर ते बारूद म्हणून करतात. बंदुकीच्या नळीमध्ये धातूचे तुकडे टाकून त्याची ठासून गोळी बनवून ते शिकारीसाठी वापर करीत आहेत.