शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पांदण रस्त्याचा वाद मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2016 00:46 IST

गावकऱ्यांनी काही वर्षापूर्वी पांदण रस्त्याला शेतजमिनी दिल्या. मात्र काम सुरु झाल्यानंतर यातील काहींनी त्याला विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता.

ठाणेदार सय्यद यांचा पुढाकार : ढिवरवाडा येथील प्रकरणपालांदूर : गावकऱ्यांनी काही वर्षापूर्वी पांदण रस्त्याला शेतजमिनी दिल्या. मात्र काम सुरु झाल्यानंतर यातील काहींनी त्याला विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. हा प्रकार लगतच्या ढिवरखेडा येथे घडला. मात्र पालांदूरचे ठाणेदार सय्यद यांनी हा वाद सामाजिक सलोख्याने मिटवून पांदण रस्त्याच्या उर्वरित कामाला सुरुवात झाली आहे. शासनाने गावाच्या विकासासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. यात गावातील अंतर्गत रस्त्यांसह नाली बांधकाम, विद्युतीकरण यासह पांदन रस्त्यांनाही मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येतो. शेत शिवाराकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात पांदण रस्ता संबोधल्या जाते. ढिवरखेडा येथील पांदण रस्ता सुमारे २५ वर्षांपासून दुर्लक्षीत आहे. यामुळे ग्रामस्थांना शेतावर जाताना अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान, ग्रामस्थांनी पांदण रस्ता व्हावा यासाठी त्यांच्या शेतीतील काही भाग रस्त्यासाठी दिला. त्यानुसार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून १३०० मीटर रस्त्याच्या कामाकरिता १३ लक्ष रुपये अकुशल कामातून प्रस्तावित करण्यात आले. या रस्त्याचे सुमारे १२०० मीटर काम सुरळीत करण्यात आले. मात्र केवळ ५० मीटर कामाकरिता लगतच्या शेतकऱ्यांनी विरोध केला.यामुळे सदर पांदण रस्त्याचे काम रखडण्यात आले. या रस्त्याच्या कामावरुन गावातील सामाजिक सलोखा दुरावण्याचे चिन्ह निर्माण झाले. याची माहिती पालांदूरचे ठाणेदार सय्यद यांना होताच त्यांनी दोन्ही गटातील नागरिकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांनी पोलीस मित्र व दोन्ही गटातील नागरिकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावरुन दोन्ही गटाने रस्त्याचा विषय मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. ठाणेदारांच्या पुढाकाराने या रस्त्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरु आहे. यासाठी सरपंच गजानन शिवणकर, पोलीस मित्र विलास शेंडे, जयंत फुल्लुके, पीतांबर फुल्लुके, रामा दहिवले, आनंद हत्तीमारे, शालिक शिवणकर, देवराम शिवणकर, युवराज शहारे, शाधु शिवणकर, सुनील थेर यांनी महत्त्वाची भूमिका निभविली. (वार्ताहर)ठाणेदारांचा पौराणिक संदेशपोलीस म्हटले की सर्वांच्या नजरेत भरतो रुबाबदार व्यक्ती, हातात काठी घेतलेला पोलीस. मात्र खाकी वर्दीतही सामाजिक दायित्व सांभाळणारा एक जबाबदार नागरिक असतो. याची प्रचिती पांदन रस्त्याच्या बाबतीत ठाणेदारांच्या मध्यस्थीतून दिसून आली. दोन्ही गटाच्या नागरिकांना कायद्याची माहिती दिली. एवढ्यावरच न थांबता रामयण व महाभारतातील उदाहरणांचा उल्लेख करीत पौराणिक कथातून त्यांनी नागरिकांना दिलेल्या संदेशातून दोन्ही गटाने सामोपचाराने मार्गाचा तिढा सोडविला.