शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

संक्रमक विषाणूंमुळे वाढताहेत आजार

By admin | Updated: September 18, 2015 00:41 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे आपणास अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यात आजारांचादेखील समावेश आहे. सर्वांत जास्त आजार हे संक्रामक विषाणूंमुळे होत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.

भंडारा : बदलत्या जीवनशैलीमुळे आपणास अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यात आजारांचादेखील समावेश आहे. सर्वांत जास्त आजार हे संक्रामक विषाणूंमुळे होत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. भारतात सर्वाधिक मृत्यू विषाणुंच्या संक्रमणाने होत असल्याचे दिसते. डास, पाणी, अन्नातूनही प्रसारभारतात होणाऱ्या संक्रामक आजारांमध्ये ९0 टक्के लोकांना अँन्टीबायोटिक्सची गरज नसते. मात्र, गोळ्या घेतल्याशिवाय बरे वाटत नसल्याची मानसिकता निर्माण झाल्याने आपण जबरदस्तीने औषधांचे सेवन करीत राहतो. आजारी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे होणाऱ्या संक्रमणाच्या या क्रियेत अनेकदा सूक्ष्म जीवांचा प्रसार जलदगतीने आणि थेट होतो. कधी-कधी थेट संक्रमण न होता डास, पाणी, अन्न यामाध्यमातूनही प्रसार होतो. याचा वेळीच इलाज करणे गरजेचे आहे. जिवाणूंचे संक्रमण झाल्याचे लक्षात येताच डॉक्टारांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. औषधांचा अयोग्य वापरशारीरिक किंवा मानसिक आजार दूर करण्यासाठी किंवा शारीरिक वेदना घालविण्यासाठी सवर्सामान्यपणे औषधांचा वापर केला जातो. औषधांमुळे जसा रोगांपासून बचाव होतो तसे त्यांच्या अयोग्य वापरामुळे अनेक नवीन आजार उदभवण्याची किंवा मृत्यू ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिबंधात्मक औषधेसंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी दोन प्रकारची औषधे वापरतात. लस किंवा प्रतिसिरम यापैकी काही औषधे, खासकरुन पोलिओची लस, अन्य प्रभावी औषधी नसल्यामुळे मौल्यवान मानली जातात. लसींमध्ये विशिष्ट रोग निर्माण करणारे जिवाणू अर्धवट किंवा मृतावस्थेत असतात. लसीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या लसीमुळे, विशिष्ट रोगाचा सामना करणारी प्रतिपिंडे निर्माण होतात. अशाप्रकारे लस एखाद्या रोगाचा संसर्ग झाल्यास प्रतिकार करण्यासाठी शरीराला प्रतिक्षम बनवते. पटकी, घटसर्प, यकृत, शोथ (कावीळ), गोवर, देवी या रोगांवर लस आता उपलब्ध असून लसीकरणामुळे देवीच्या रोगाचे निर्मूलन शक्य झाले आहे. मधुमेहासारखे विकारसंक्रमण झालेल्या व्यक्तीची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती, लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढली असण्याची शक्यता असते. काही औषधीच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती घटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय पोषणाची स्थिती, मधुमेहासारखे विकार यांसारखे अनेक घटक रोगनिमिर्तीवर बरेवाईट प्रभाव पाडू शकतात. प्रभावी औषधोपचार घेत आहे अथवा नाही आणि इतरांना संसर्ग टाळावा म्हणून आपल्या परीने किती काळजी घेत आहे यांवरही संसर्गातून पसरणाऱ्या जीवांचे प्रमाण अवलंबून असते.