शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

गावठाणाबाहेरील प्रकल्पग्रस्त पॅकेजपासून वंचित

By admin | Updated: August 1, 2016 00:21 IST

जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला.

पॅकेज देण्यास दिरंगाई : गोसीखुर्द पुनर्वसन विभागाचे दुर्लक्ष भंडारा : जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. ज्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन घरदार बहाल केले, गोसेखुर्द प्रकल्पाला आज २५ वर्षे होऊन गेले. परंतु प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही सुखले नाही. उलट समस्याच वाढत आहे. अशातच खैरी (सालेबर्डी) येथील गावठाण बाहेरील ६० कुटुंबांना अजूनही पुनर्वसन पॅकेज मिळाले नाही. याकडे गोसेखुर्द विभागाचे व जिल्हा प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबे रोज जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन संबंधित विभागात रोज चकारा मारत आहेत. परंतु त्यांना अजूनही पॅकेज मिळाले नसून, संबंधित विभागाविरुद्ध प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे.खैरी (सालेबर्डी) येथील गावठाणाबाहेरील ६० घरे भूसंपादन प्रकरणात संपादित करण्यात आले. परंतु अजूनपर्यंत गावठाण बाहेरील ते ६० कुटुंबे अजूनही पॅकेज पासून वंचित आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.खैरी या गावाचे पुनर्वसन अशोकनगर (फुलमोगरा) या नियोजितस्थळी युद्धपातळीवर काम सुरु आहे. काही कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास गेली. त्याचप्रमाणे गावठाणाबाहेरील ६० घरांना सुद्धा भूखंड, मोबदला सुद्धा मिळाला आहे. सदर कुटुंबे स्वेच्छा पुनर्वसन करण्याच्या तयारीत असतानासुद्धा गोसेखुर्द पुनर्वसन विभाग या ६० कुटुंबांना पॅकेज देण्यास दिरंगाई करीत आहे. तसेच या कुटुंबांनी पुनर्वसन ठिकाणी बांधकामास सुरुवात सुद्धा केलेली व तुटपूंज्या मोबदला देऊन त्यांचे बांधकाम अर्धवट आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना जर प्रशासनाने पॅकेज दिले तर त्यांचे घरांचे बांधकाम पूर्णत्वास येण्यास मदत होईल. सदर कुटुंबाची जुनी घरे मोडकळीस आले आहेत. दरवर्षी घरांची दुरुस्ती करून नाकीनऊ आले आहे. जीव मुठीत घेऊन ही कुटुंबे मोडक्या घरात वास्तव करीत आहे. तरी संबंधित विभाग व प्रशासनाने या ६० कुटुंबांना लवकरात लवकर पॅकेज देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)