शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

गावठाणाबाहेरील प्रकल्पग्रस्त पॅकेजपासून वंचित

By admin | Updated: August 1, 2016 00:21 IST

जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला.

पॅकेज देण्यास दिरंगाई : गोसीखुर्द पुनर्वसन विभागाचे दुर्लक्ष भंडारा : जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. ज्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन घरदार बहाल केले, गोसेखुर्द प्रकल्पाला आज २५ वर्षे होऊन गेले. परंतु प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही सुखले नाही. उलट समस्याच वाढत आहे. अशातच खैरी (सालेबर्डी) येथील गावठाण बाहेरील ६० कुटुंबांना अजूनही पुनर्वसन पॅकेज मिळाले नाही. याकडे गोसेखुर्द विभागाचे व जिल्हा प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबे रोज जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन संबंधित विभागात रोज चकारा मारत आहेत. परंतु त्यांना अजूनही पॅकेज मिळाले नसून, संबंधित विभागाविरुद्ध प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे.खैरी (सालेबर्डी) येथील गावठाणाबाहेरील ६० घरे भूसंपादन प्रकरणात संपादित करण्यात आले. परंतु अजूनपर्यंत गावठाण बाहेरील ते ६० कुटुंबे अजूनही पॅकेज पासून वंचित आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.खैरी या गावाचे पुनर्वसन अशोकनगर (फुलमोगरा) या नियोजितस्थळी युद्धपातळीवर काम सुरु आहे. काही कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास गेली. त्याचप्रमाणे गावठाणाबाहेरील ६० घरांना सुद्धा भूखंड, मोबदला सुद्धा मिळाला आहे. सदर कुटुंबे स्वेच्छा पुनर्वसन करण्याच्या तयारीत असतानासुद्धा गोसेखुर्द पुनर्वसन विभाग या ६० कुटुंबांना पॅकेज देण्यास दिरंगाई करीत आहे. तसेच या कुटुंबांनी पुनर्वसन ठिकाणी बांधकामास सुरुवात सुद्धा केलेली व तुटपूंज्या मोबदला देऊन त्यांचे बांधकाम अर्धवट आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना जर प्रशासनाने पॅकेज दिले तर त्यांचे घरांचे बांधकाम पूर्णत्वास येण्यास मदत होईल. सदर कुटुंबाची जुनी घरे मोडकळीस आले आहेत. दरवर्षी घरांची दुरुस्ती करून नाकीनऊ आले आहे. जीव मुठीत घेऊन ही कुटुंबे मोडक्या घरात वास्तव करीत आहे. तरी संबंधित विभाग व प्रशासनाने या ६० कुटुंबांना लवकरात लवकर पॅकेज देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)