शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

‘डर्टी वॉटर’मुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: November 24, 2014 22:52 IST

लाखनी व साकोली तालुक्यातील १९ गावांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत साकोली येथे जलशुध्दीकरण योजना तयार करण्यात आली. ही योजना पुर्णत्वास आली असली

संजय साठवणे - साकोलीलाखनी व साकोली तालुक्यातील १९ गावांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत साकोली येथे जलशुध्दीकरण योजना तयार करण्यात आली. ही योजना पुर्णत्वास आली असली तरी जिल्हा परिषदेच्या हस्तांतरणाशिवाय जुलै महिन्यापासून ही योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे साकोली व लाखनी तालुक्यातील नागरिकांना ‘डर्टी वॉटर’ प्यावे लागत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा धोका बळावला आहे.साकोली व लाखनी तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईसाठी राज्य शासनाने २०.५७ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. यात जलशुध्दीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने दहा वर्षापुर्वी बांधकाम करण्यात आलेल्या व ‘हुडको’च्या अर्थसहाय्याने या जलशुध्दीकरण केंद्राचे काम पुर्ण करण्यात आले. या योजनेअंतर्गत साकोली तालुक्यातील साकोली, जांभळी, शिवनीबांध, खंडाळा, सावरबांध, पिंडकेपार, बोदरा, सेंदुरवाफा तर लाखनी तालुक्यातील पोहरा, लाखोरी, पिंपळगाव, मानेगाव, पेंढरी, गडेगाव, साखरी, सोमलवाडा, गोंडसावरी व रेंगेपार अशा १९ गावांना शुध्द पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. या योजनेला दररोज पाणीसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी कुंभली येथील चुलबंद नदीवर तयार होणाऱ्या निम्न चुलबंद प्रकल्पाचा आसरा घेण्यात आला. मात्र या प्रकल्पालाही पुर्ण होण्यासाठी भरपुर काळ लोटला. मागीलवर्षी या प्रकल्पाचे पाणी अडविण्यात आले. त्यामुळे ही जलशुध्दीकरण योजना सुरू करण्यात आली होती. मात्र ऐन उन्हाळ््यातच पाणीसाठा संपल्याने ही योजना पाण्याअभावी बंद पडली होती. यानंतर पावसाळ््यात पुन्हा पाणी अडविण्यात आले. शुध्द पाणी मिळेल, असे लोकांना वाटले परंतु अपेक्षाभंग झाला. ही योजना पाच महिन्यापासून बंद आहे.