शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

धुळवडीत ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ची धूम

By admin | Updated: March 26, 2016 00:28 IST

होळी, धुळवड आणि लागून आलेल्या सुट्यांमुळे ड्रंक अँण्ड ड्राइव्हच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

भंडारा : होळी, धुळवड आणि लागून आलेल्या सुट्यांमुळे ड्रंक अँण्ड ड्राइव्हच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. सातत्याने होत असलेल्या जनजागृतीमुळे टिळा लावून धुळवड साजरी करण्यात आली. वाहतूक पोलीसांनी होळीच्या दिवशी एकूण ६५ तर, धुलिवंदनाच्या दिवशी ११ केसेस दाखल केल्या होत्या. यामध्ये दारू पिऊन वाहन चालविण्याच्या दोन केसेस धूलिवंदनाच्या दिवशी दाखल आहेत.धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन वाहने चालवताना वाहनचालकांकडून अन्य नियमही धाब्यावर बसविले जातात. अशा वाहनचालकांची वाहतूक पोलिसांकडून धरपकड करून दंडात्मक कारवाईही केली जाते. गुरुवारी, धूलिवंदनाच्या दिवशी एकूण ११ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. धुलीवंदनाच्या दिवशी वाहनचालकांकडून सर्रासपणे नियम धाब्यावर बसविले जातात. त्यामुळे अशा चालकांना जाळ्यात पकडण्यासाठी यावेळी वाहतूक पोलिसांनी व्यूहरचना आखली होती. शहर आणि महामार्गावर यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात येत होती. पोलिसांचे विशेष लक्ष हे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालक आणि वाहनांवर होते. त्याचबरोबर ट्रिपल सीट आणि अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांचीही धरपकड केली जात होती. (नगर प्रतिनिधी)सोशल मीडिया 'कलरफुल्ल'दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सप्तरंगांची उधळण सुरू झाली होती. याचाच प्रत्यय गुरुवारी धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या जोरदार सेलिब्रेशनमध्येही दिसून आला. पाण्याचा अपव्यय टाळत, सुक्या रंगांची होळी खेळत भंडारेकरांनी धुळवड साजरी केली. जोशपूर्ण वातावरणात मात्र सामाजिक भान जपत जिल्हावासीयांनी रंगपंचमी साजरी केल्याचे दिसून आले. बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेला रंगपंचमीचा जल्लोष गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत दिसून आला. शिवाय, दुपारनंतर सर्वांचेच व्हॉट्स अँप विविध रंगांमध्ये न्हाऊन गेलेले दिसून आले.स्वच्छतेबाबत उदासीनता जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असताना यावर्षीची धुळवड साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन अनेक सामाजिक संस्था व शासनातर्फे करण्यात आले होते. मात्र तरी देखील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी करूनच रंगांची उधळण करण्यात आली. काहींनी केवळ टिळा लावून धुळवड साजरी केली. देशभरात स्वच्छता अभियान राबवले जात असून नागरिकांमध्ये मात्र स्वच्छतेबाबत उदासीनता दिसून आली. अनेक ठिकाणी कचराच कचरा अस्ताव्यस्त पसरलेले होते.इको फ्रेंडली होळीअनेक ठिकाणी पाणीटंचाई सुरू असताना होळी खेळण्याकरिता पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अनेक ठिकाणी कोरडी होळी खेळली गेली. त्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय टाळता आला. गावा गावात जल बचत करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने अनेकांनी कौतुक केले.