शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

धापेवाडाचे पाणी पोहोचणार करडीत

By admin | Updated: March 29, 2017 00:44 IST

करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. त्यासाठी सुरेवाडा व करचखेडा उपसा सिंचन योजनेला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

पालोरा येथे पत्रपरिषद : नाना पटोले यांची माहितीकरडी (पालोरा) : करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. त्यासाठी सुरेवाडा व करचखेडा उपसा सिंचन योजनेला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. काही कारणांमुळे योजना पूर्ण होण्यास विलंब होत आहे. सुरेवाडा उपसा सिंचन योजनेचा ब्ल्यूप्रिंट तयार आहे. बरीच कामेही झाली आहेत. धापेवाडा टप्पा क्रमांक २ चे पाणी चोरखमारा व अन्य जलाशयात करडी परिसरातील शेतीला सिंचनासाठी आणली जाईल. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खा. नाना पटोले यांनी दिलीे. पालोरा येथे आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. धापेवाडा टप्पा क्रमांक दोन मधून गर्रा, बोदलकसा, चोरखमारा आदी जलाशयात पाणी सोडले जाईल. तलावांच्या माध्यमातून शेती सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सिंचनाचा समस्या सन २०१९ पर्यंत दूर होईल. केंद्र सरकारने बजेटमध्ये शेतीवर आधारित उद्योगनिर्मितीवर भर दिला आहे. उद्योगांचे माध्यमातून रोजगाराचा प्रश्न सोडविला जाणार आहे. शेती व शेतकऱ्यांची उन्नती त्यातून साध्य होणार आहे. वैनगंगा नदीवरील पुलासाठी प्रशासकीय व तांत्रिक मजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील दोन्ही भाग आपसात जोडले जाणार असून नागरिकांसाठी पुल उपयोगी ठरणार आहे. १६ व १२ तासांच्या भारनियमन प्रश्नावर पटोले म्हणाले, माझी लढाई मी माझ्या बरोबरच्या लोकांबरोबर करतो. लहानांसोबत करीत नाही. लहान भावाने लहानासारखेच वागले पाहिजे. करडी प्रकरणी त्यांनी शौचालयासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. ज्यांना अगोदर लाभ मिळाला असेल, मात्र त्यांचेकडील शौचालयाची अवस्था खराब असेल, अशा सर्वांना १२ हजार रूपयांचा लाभ रोजगार हमी योजनेतून दिला जाईल, दुरूस्तीनुसार लाभ दिली जाणार नाही. परंतु ज्यांचेकडे पक्के बांधकाम आहे. त्यांना लाभ मिळणार नाही. मोहफुलाला वनोपज वाहतुक परवान्यातून मुक्त करण्यात आले. टॅक्समुक्तीवरही विचार सुरू आहे.सन २०१९ पर्यंत घरकुलांचा प्रश्न सोडविला जाणार आहे. कोणालाही घरापासून वंचित ठेवला जाणार नाही. पक्षपात व भेदभाव केला जाणार नाही. बीपीएल, एपीएल अशा भेदभाव न करता गरवंत हीच कसोटी राहणार आहे. त्यामुळे गरजवंताना प्राधान्य देण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची आवश्यकता आहे, परंतु गरिबांच्या आड कुणी येत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. मग ते कुणीही असोत, जिल्हा परिषद सदस्यता सरिता चौरागडे यांचा अपात्रतेचा प्रश्न सुटलेला आहे. आता त्या जि.प. सदस्या आहेत. त्यांचे प्रकरणी गैरसमज ठेवण्याची आवश्यकता नाही. अन्न सुरक्षा योजनेमुळे कुणीही गरीब उपाशी राहणार नाही. ही योजना आरक्षण मुक्त करण्यात आली आहे. भेदभाव संपुष्टात आणण्यात आला आहे. परंतु त्यातही लाभार्थी हा गरजवंत असणे आवश्यक आहे. पत्रपरिषदेला जि.प. सदस्या सरिता चौरागडे, माजी जि.प. सदस्य के.बी. चौरागडे, पं.स. सदस्य महादेव बुरडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निशिकांत इलमे, छावा संग्रामचे तालुकाध्यक्ष उमेश तुमसरे, जांभाराचे माजी सरपंच जगदिश गोबाडे, मोहगावचे उपसरपंच अशोक शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)