शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

जिल्ह्यात धान रोवणी जोमात

By admin | Updated: July 21, 2014 23:41 IST

जुलैच्या पंधरवडापर्यंत दडी मारलेल्या पावसाने अखेर सुरूवात केली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात धाानाच्या रोवण्या फक्त

५३ टक्के पाऊस : ४० टक्के रोवण्या आटोपल्या, शेतकऱ्यांना दिलासाभंडारा : जुलैच्या पंधरवडापर्यंत दडी मारलेल्या पावसाने अखेर सुरूवात केली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात धाानाच्या रोवण्या फक्त २.०७ टक्के पार पडल्या होत्या. आता ती ४० टक्क्यांपर्यंत पोहचली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात यावर्षी १ लाख ८१ हजार ५९१ हेक्टर क्षेत्र धान लागवडीखाली येणार आहे. यातील १७ हजार ३४६ हेक्टरपैकी १६ हजार १४१ हेक्टर क्षेत्रात धान पऱ्यांच्यामाध्यमातून म्हणजे सरासरी ९३ टक्के धान रोवणीची लागवड करण्यात आली आहे. सध्यास्थितीत सुरू असलेल्या पावसाच्या प्रमाणात आवत्याने धानाची रोवणीत मोठी वाढ झाली आहे. आवत्याने धानाची लागवड जवळपास १४० टक्क्यांवर पोहचली आहे. जिल्ह्यात १० हजार २११ हेक्टरवर आवत्याने धानाची रोवणी होणार असून, या तुलनेत जिल्ह्यात १४ हजार ३५८ हेक्टर क्षेत्रात आवत्याने धानाची रोवणी झाली आहे. यावर्षी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याने रोवणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पार पडली असून ती जवळपास ७० हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे.भंडारा तालुक्यात २२ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी करण्यात येणार आहे. मोहाडीत २८ हजार ८३० हेक्टर, तुमसर २८ हजार ३४० हेक्टर, पवनी २९ हजार ३९३ हेक्टर, साकोली २२ हजार ०७० हेक्टर, लाखनी २० हजार ५३० आणि लाखांदूरमध्ये २९ हजार ७२० हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तीन दिवसांपासून धानाच्या रोवण्यांना जोमाने सुरूवात झाली आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यात पावसाची स्थिती चांगली असल्याने तेथील शेतकरी धान रोवणी आटोपण्याच्या कामात गुंतले आहे.उत्पादनात वाढ होण्याची शक्यतासमाधानकारक पाऊस पडल्याने यावर्षी धान उत्पादन कमी होण्याऐवजी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा कृषी अधिक्षक हनुमंत कुदले यांच्याशी संपर्क साधला असता, पूर्वमध्ये कमी पाऊस पडल्याने धान रोवण्या उशिरा झाल्याने शेतकरी चिंतीत होते आणि धान उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र दमदार पावसाने ही चिंता आता मिटली आहे. (शहर प्रतिनिधी)