शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांमुळे रब्बी हंगामातील उत्पादनाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

रंजीत चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात जंगलव्याप्त गावाचे शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांचे उपद्रवाने पिकांचे प्रचंड नुकसान ...

रंजीत चिंचखेडे

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात जंगलव्याप्त गावाचे शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांचे उपद्रवाने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. हरभरा पिकांची नासाडी झाली आहे. धान उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. वन विभागाची देण्यात येणारी आर्थिक मदत आखडती असल्याने सरसकट मदत घोषित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सिहोरा परिसरात खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी उत्पादन घेत आहेत. परंतु वन्य प्राण्यांचे उपद्रवाने पिकांचे प्रचंड नुकसान सोसण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. हरभरा पिकांचे नुकसान वन्य प्राणी करीत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दिवस रात्र शेतशिवारात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार राहत असल्याने शेतकऱ्यांना डोक्यावर हात ठेवण्याची पाळी आली आहे. पिकांचे नुकसान वन्यप्राणी रानडुक्कर करीत आहेत. पिकांचे मुळे पोखरून काढत असल्याने अतोनात नुकसान सोसावे लागत आहे. शेत शिवारातून वन्यप्राण्यांना हाकलून लावण्यासाठी शेतकरी अनेक उपाययोजना करीत असले तरी यात ते यशस्वी होताना दिसत नाहीत. पिकांचे नुकसान सोसल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. वन्य प्राण्यांचे बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वन विभागाला वारंवार सूचना देत आहेत. निवेदनाचा पाऊस करीत आहेत. परंतु युद्धस्तरावर वन्य प्राण्यांचे बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नाहीत. शेत शिवाराला सुरक्षित करण्यासाठी महत्वाकांक्षी योजना नाही. वन्य प्राण्यांचे कायमस्वरूपी बंदोबस्त करता येत नाहीत. यामुळे वन्यप्राणी आणि शेतकरी असा संघर्ष होताना दिसत आहे. वन्य प्राण्यांची हत्या करण्यासाठी खाद्य पदार्थात स्फोटकांचे मिश्रण करण्यात येत आहेत.

जंगल शेजारी असणाऱ्या गावाचे शेतशिवारात मृतावस्थेत अनेक रानडुक्कर आढळून आलेल्या आहेत. वन विभागाच्या यंत्रणेने हा अनुभव घेतला आहे. पंचनामा केल्यानंतर मृत रानडुक्करांना जमिनीत पुरण्यात आले आहेत. अन्य वन्य प्राण्यांचे बाबतीत असेच चित्र आहे. या वन्य प्राण्यांची माहिती मात्र वन विभागाला देण्यात येत नाही. दरम्यान पिकांचे नुकसान झाल्यानंतर वन विभागाची यंत्रणा सर्वेक्षण करीत आहेत. परंतु आर्थिक मदत आखडती असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. सर्वेक्षणाच्या आधारावर देण्यात येणारी आर्थिक मदत तोडकी आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वन्य प्राण्यांचे करवी नासाडी असे संकट शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत घोषित करण्यात येत नाही. एकरी देण्यात येणारी मदत नुकसान भरपाईचा आकडा ओलांडत नाही. नुकसान हजारो रुपयांचे घरात असताना शेकडोची मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे.

जंगलव्याप्त गावाशेजारील शेतकरी हतबल

जंगलव्याप्त गावांचे शेजारील शेतकरी, परिसरातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने हतबल झाले आहेत. धान उत्पादन शेतकऱ्यांचे पुजण्याची नासाडी रानडुक्कर करीत असल्याचे अनेक प्रकरणे वन विभागाच्या दालनात दरवर्षी सादर करण्यात येत आहेत. परंतु आर्थिक मदत दिली जात नाही. या शिवाय शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती राहत असल्याने भगवान भरोसे पिकांना सोडले जात आहेत. शासन स्तरावरुन शेतकऱ्यांना सुजलाम्‌ सुफलाम्‌ करण्यासाठी नुकसान भरपाई देताना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी भाजपचे युवा नेते किशोर राहगडाले, भाजयुमोचे विनोद पटले, ग्रामपंचायत सदस्य शीतल चिंचखेडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश सोनवणे, योगराज टेंभरे, सरपंच सुषमा पारधी, सरपंच उर्मिला लांजे, सरपंच वैशाली पटले यांनी केली आहे.