शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

साकोली तालुक्यातील धानपीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:33 IST

हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या आशेने शेतात रोवणी केलेल्या धानावर एका पाण्याने अक्षरश: पाणी फेरले. संपूर्ण साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत. दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आणि अपुºया सिंचन व्यवस्थेने साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी देशोधडीला : अपुऱ्या सिंचन व्यवस्थेचा बसतोय फटका

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या आशेने शेतात रोवणी केलेल्या धानावर एका पाण्याने अक्षरश: पाणी फेरले. संपूर्ण साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत. दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आणि अपुऱ्या सिंचन व्यवस्थेने साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत. आता शेतकºयांना दुष्काळ घोषित होण्याची आणि मदतीची अपेक्षा आहे.साकोली हा प्रमुख भात उत्पादक तालुका होय. पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली. दमदार पावसाने पºहे उगवले. शेतकºयांची आशा उंचावली. प्रचंड मेहनत करून पºह्यांची रोवणी करण्यात आली. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली. मात्र आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे धानपीक शेतात बहरू लागले. मात्र शेतकऱ्याचा हा आनंद काही काळच टिकला. पावसाने दडी मारली ती कायमची. दसरा गेला तरी पावसाचा पत्ता नाही. शेतातील धान पाण्याअभावी करपू लागले. सिंचनाची सुविधा असतानाही प्रशासनाच्या नियोजन शून्यतेने ओलीत करणे शक्य झाले नाही. भारनियमनाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे. अशा स्थितीत पीक वाचविताना शेतकरी उध्वस्त झाला. आता हलका धान काढणीला आला आहे. मात्र अपेक्षित उत्पन्न होत नसल्याचे दिसत आहे. उच्च प्रतीच्या धानावर किडींनी आक्रमण केले आहे. महागडे बियाणे फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.साकोली केंद्रावर २४८ क्विंटल धान खरेदीसाकोली येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी या धान खरेदी केंद्रावर २४८ क्विंटल धानाची खरेदी झाली. यावरूनच तालुक्यात दुष्काळस्थिती किती भीषण आहे याची कल्पना येते. शासनाने दुष्काळ घोषित करावा अशी मागणी आता तालुक्यातून होत आहे.