शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मोहरणावासीयांच्या विरोधानंतरही रेतीचा उपसा राजरोसपणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 22:07 IST

तालुक्यातील मोहरणा रेतीघाटातील रेतीउपसामुळे मोहरणावासी त्रस्त झाले.

ठळक मुद्देशासकीय जागेवर रेतीचा साठा : रेतीच्या साठ्याखाली दबली झाडे

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील मोहरणा रेतीघाटातील रेतीउपसामुळे मोहरणावासी त्रस्त झाले. ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी मिळून रेतीउपसावर बंदी घालीत ट्रक अडवून धरले होते. 'आधी रस्ते दुरुस्त करा, मगच रेती उपसा करा' या मागणीकडे अखेर प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा गावकºयांच्या विरोधात रेतीउपसा सुरू असला तरी विरोध खदखदतच आहे.लाखांदूर तालुक्याला वैनगंगा व चुलबंद नदीची मोठी देणं आहे. नैसर्गीक साधन संपत्तीने समृद्ध हा तालुका मात्र रेतीघाटाच्या लिलावामुळे विकासाच्या अगदी विरुद्ध जात असतानाचे चित्र मागील अनेक वर्षांपासून बघायला मिळत आहे. अनेकदा विरली, इटान, गावराळा, मोहरणा येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकºयांनी अनेकदा आंदोलने केली, निवेदने दिली, परंतु प्रशासनापुढे काही एक न एकूण घेतल्याने संपूर्ण चौरास भागातील लाखो रुपये खर्चून तयार केलेले नवीन कोरे रस्ते दोन दिवसात खड्डेमय झाले. गवराळा वासीयांनी तर तीव्र आंदोलन केले असता न्याय मिळू शकला नाही. यंदा पुन्हा मोहरणा येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकºयांनी रेती उपसा व वाहतुकीविरुद्ध एल्गार पुकारला. चक्क ओव्हरलोड रेती भरलेले ट्रक अडवून धरले. रेती उपसावर बंदी घातली. आधी ग्रामपंचायत अंतर्गत सर्व खराब झालेले रस्ते दुरुस्त करून द्या, नंतरच रेतीघाट सुरू करा ही प्रमुख मागणी जोर धरू लागली. अन संपूर्ण गाव एक झाला. लहान मुले, महिला, पुरुष रस्त्यावर उतरले. तहसीलदारांना निवेदन सादर केले. परंतु काही एक अर्थे झाला नाही, लगेच दुसºया दिवसांपासून गावकºयांच्या विरोधात रेतीघाट सुरू झाला. मात्र गावकºयांमध्ये तीव्र रोष अजूनही खदखदत आहे.मोहरणा रेतीघाट शासनाची तिजोरी भरण्यासाठी फायद्याची असली तरी मोहरणावासीयांसाठी मात्र धोक्याची घंटा ठरत आहे. रेतीघाट कंत्राटदाराने चक्क शासकीय जागेवर रेतीसाठा केला. शतकोटी वृक्ष लागवड केलेल्या जागेवर रेतीसाठा केल्याने हजारो झाडे रेतीखाली दबली. अलिकडेच ग्रामपंचायतने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार केलेला स्मशानभूमीचा रस्ता उखडला. मुख्य रस्ता ओव्हरलोड रेतीच्या ट्रकांमूळे पूर्णत: खराब झाला. विद्याार्थ्याचे अपघातामुळे शाळेत ये - जा बंद झाले.सीमांकनाच्या बाहेरची रेती उपसा होऊ लागली. हे सर्व बघून गावकºयाचा राग अनावर झाला. तहसीलदार लाखांदूर यांना निवेदन सादर करून रेतीघाट बंद करण्याची मागणी केली होती.जिल्हा खनिकर्म,महसूल विभाग गप्प का?लाखांदूर तालुक्यातील मोहरणा रेतीघाटातील रेतीउपसामुळे मोहरणावासी त्रस्त झाले असताना, ओव्हरलोड रेती वाहून नेली जात आहे. सीमांकणाच्या बाहेरील रेतीचा उपसा होत असताना अहोरात्र रेतीचा उपसा होत आहे. तरीही जिल्हा खनिकर्म/महसूल विभाग गप्प का? असा प्रश्न गावकºयांपुढे निर्माण झाला आहे. गावातीलच ट्रॅक्टरधारकांवर कारवाईचा बडगा दाखविणारे आता गप्प का? असा प्रश्न विचारल्या जात आहे.