शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

रेती तस्करांची नावे उघड होऊनही कारवाई शून्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

टेंभरी विहिरगाव येथील प्रकरण लाखांदूर : टेंभरी विहिरगाव नदीघाटातून रेतीचा अवैध उपसा करून एका शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतातील अवैध रेतीसाठा ...

टेंभरी विहिरगाव येथील प्रकरण

लाखांदूर : टेंभरी विहिरगाव नदीघाटातून रेतीचा अवैध उपसा करून एका शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतातील अवैध रेतीसाठा तहसील प्रशासनाने जप्त केला होता. सदरप्रकरणी एका शेतमालकाने तालुक्यातील ४ रेती तस्करांची नावे तहसीलदारांसह पोलीस प्रशासनाकडे तक्रारीसह दाखल केली. मात्र शेतकऱ्याच्या सदर तक्रारीकडे तहसील व पोलीस प्रशासनाअंतर्गत हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने रेती तस्करांची नावे उघड होऊनही कारवाईला तहसीलदारांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा जोरदार आरोप शेतकऱ्यांसह जनतेतून केला जात आहे.

माहितीनुसार, गत १५ जून रोजी लाखांदूर तालुक्यातील टेंभरी विहिरगाव नदीघाट परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतातून लाखांदूर तहसीलदारांनी जवळपास १५० ब्रास अवैध रेतीसाठा पंचनामा करून जप्त केला होता. जप्त केलेल्या रेतीसाठ्याची रेती तस्करांकडून रात्रीच्या सुमारास चोरी होण्याच्या भीतीने तहसील प्रशासनाअंतर्गत तडकाफडकी उचल देखील करण्यात आली आहे. सदर कारवाईने धास्तावलेल्या विहिरगाव येथील एका शेतकऱ्याने सदर अवैध रेतीसाठाप्रकरणी तालुक्यातील चार रेती तस्करांविरोधात तहसील व पोलीस प्रशासनाकडे मागील १५ दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार तहसीलदारांनी संबंधित चारही रेती तस्करांना नोटीस बजावून बयाने नोंदविण्यात आली आहेत. पण तब्बल पंधरवडा लोटूनही लाखांदूर तहसीलदारांकडून शेतकऱ्याची तक्रार असताना देखील रेती तस्करांविरोधात कोणतीच कारवाई न करण्यात आल्याने शेतकऱ्यांसह जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गत काही महिन्यांपूर्वीपासून तालुक्यात खुलेआम रेती तस्करी सुरू असताना तहसील प्रशासनाकडून केवळ राजकीय दबावात रेती तस्करांविरोधात कोणतीच कारवाई केली जात नसल्याची ओरड आहे. तथापि तालुक्यातील टेंभरी विहिरगाव नदीघाट परिसरात कोट्यवधी रुपये किमतीचा अवैध रेतीसाठा पंचनामा करून जप्त करताना शेतकऱ्याने रेती तस्करांची नावे तक्रारीतून उघड केली असताना देखील लाखांदूर तहसीलदार केवळ राजकीय दबावापोटी संबंधितांच्याविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा जोरदार आरोप जनतेतून केला जात आहे.

शासनाने तात्काळ दखल घेऊन टेंभरी विहिरगाव नदीघाट परिसरात रेतीचा अवैध उपसा व साठाप्रकरणी शेतमालकाने तक्रारीद्वारे नावे उघड केलेल्या रेती तस्करांविरोधात दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यासह जनतेतून केली जात आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी तहसीलदारांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.